शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप सिकर जिल्हा आणि आसपासच्या भागात सर्वात जास्त जाणवला. तथापि, सौम्य भूकंपामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जयपूरच्या वायव्येस सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर, सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होते. सकाळी ६:३० च्या सुमारास आलेला हा भूकंप फक्त काही सेकंद टिकला.
वृत्तानुसार, खाटूश्यामजी, पलसाणा, धिंगपूर आणि सीकर जिल्ह्यातील आसपासच्या भागात लोकांना सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे एक-दोन सेकंद चाललेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. पलसाणा परिसरातील अनेक रहिवाशांनी सांगितले की भूकंपाच्या वेळी त्यांच्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या हादरल्या.







