अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेला 'प्राथमिक तपास अहवाल' (Preliminary Investigation Report) आज सायंकाळी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) हा अहवाल नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) सुपूर्द करणार असून, यातून अपघाताच्या नेमक्या कारणांवरून पडदा उठण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे, कारण हा तपास केवळ तांत्रिक स्वरूपाचा नसून गुन्हेगारी कोनातूनही केला जात आहे. या तपासाचा मुख्य आधार विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' असून, तो सुदैवाने सुरक्षित मिळाला आहे. त्यामध्ये रेकॉर्ड झालेले वैमानिकाचे शेवटच्या क्षणांचे संभाषण आणि विमानाचा तांत्रिक डेटा यातून विमानाचे इंजिन हवेत असतानाच निकामी झाले होते का, याचे उत्तर मिळणार आहे. याशिवाय, ज्या खासगी कंपनीकडे विमानाची जबाबदारी होती, त्या 'VSR व्हेंचर्स' ने विमानाची वेळेवर आणि योग्य प्रकारे देखभाल केली होती का? की यामागे काही तांत्रिक हलगर्जीपणा होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या अहवालातून समोर येतील. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा सत्य वृत्तांत समोर येण्यासाठी आता काही तासांचीच प्रतीक्षा उर्ती आहे


आमदार रोहित पवार यांनी या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणातील ठोस पुरावे समोर आणण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सीआयडी (CID) या प्रकरणाचा समांतर तपास करत असून तांत्रिक बाबींची पडताळणी केली जात आहे. आज सायंकाळी येणाऱ्या तांत्रिक अहवालाच्या आधारावरच या प्रकरणात गुन्हेगारी स्वरूपाचा एफआयआर (FIR) दाखल करायचा की नाही, याचा अंतिम निर्णय सीआयडी घेणार आहे. त्यामुळे या तांत्रिक अहवालाकडे आता केवळ प्रशासनाचेच नव्हे, तर राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.



VSR व्हेंचर्स'ला मोठा दणका


विमान अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिटमध्ये सुरक्षिततेच्या गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. याची तातडीने दखल घेत DGCA (नागरी विमान वाहतूक संचालनालय) ने संबंधित विमान कंपनीची उर्वरित पाचही विमाने तूर्तास 'ग्राऊंडेड' केली आहेत, म्हणजेच त्यांच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. कंपनीच्या कामकाजातील या उणिवांमुळे संशयाची सुई आता व्यवस्थापनाकडे वळली आहे. अशा परिस्थितीत, आज सायंकाळी येणारा तांत्रिक तपास अहवाल हा केवळ अपघाताचे कारणच स्पष्ट करणार नाही, तर या कंपनीसाठी आणि संपूर्ण तपासासाठी एक 'टर्निंग पॉईंट' ठरणार आहे.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला