Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला हौतात्म्य आले. मिथुन मंडल असे या हुतात्मा जवानाचे नाव असून ते मोंगकोट चेपु परिसरात गस्त घालत असताना दुपारी ४:३० वाजेच्या सुमाराला त्यांना गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इम्फालच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मिथून मंडल पश्चिम बंगालमधील भगजन टोला गावचे रहिवासी होते.



मुख्यमंत्र्यांकडून तीव्र निषेध :


मुख्यमंत्री यमनाम खेमचंद सिंह यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “कॉन्स्टेबल मिथुन मंडल यांचे बलिदान अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या शौर्याचा सन्मान राखला जाईल आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.” अशी ग्वाही त्यांनी दिली.



इंटरनेट सेवा बंद :


फेब्रुवारी महिन्यापासून जातीय हिंसाचाराचा सामना करणाऱ्या या भागात अद्याप तणाव कायम आहे. उग्रवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून सतत शोधमोहीम राबवली जात आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने ५ जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवांवरील बंदी आणखी २ दिवसांसाठी वाढवली आहे. ही बंदी इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, ककचिंग आणि बिष्णुपूर या जिल्ह्यांमध्ये लागू राहणार आहे.



६ तरुणांना अटक :


सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच हिंगगांग पोलीस ठाणे परिसरात सुरक्षाबलांवर हल्ला आणि शस्त्रे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६ तरुणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन