भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने-सामने येणार आहेत. सलामीच्या 'सुपर ८' सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार असून, उपांत्य फेरीची वाट सुकर करण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा सामन्यात म्हणजे २६ फेब्रुवारी भारत विरुद्ध श्रीलंका आणि १ मार्चला भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असा सामना खेळवला जाणार आहे.


भारतीय संघाने साखळी फेरीत पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत सलग ४ विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेनेही सलग ४ सामने जिंकून आपली ताकद दाखवून दिली आहे. दोन्ही संघ तुल्यबळ असले तरी भारताची मजबूत फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी पाहता टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे.


भारतीय संघासाठी सध्या सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म. मागील तिन्ही सामन्यांत त्याला एकही धाव काढता आलेली नाही (सलग ३ डक्स). अशा स्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादव त्याला पुन्हा संधी देतो की संघात बदल करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताकडे कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग आणि अक्षर पटेल अशी स्फोटक फलंदाजांची फळी आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग यांच्या सोबतीला कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची फिरकी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची फिरकी घेऊ शकते.


अहमदाबादची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना पोषक असते, मात्र जसजसा खेळ पुढे जातो, तसतसे फिरकीपटू प्रभावी ठरतात. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी भारतीय फलंदाजांना कशी रोखते यावर सामन्याच भवितव्य अवलंबून आहे.


कगिसो रबाडा, मार्को जेन्सन, लुंगी एनगिडी, केशव महाराज असे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीतही एडन मार्क्रम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, रासी व्हॅन डेर डूसन, हेन्रिच क्लासेन असे नामवंत फलंदाज आहेत ते चांगली धवसंख्या उभारु शकतात.भारताविरुद्ध मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये विजय मिळवणे हे त्यांच्यासाठी आव्हानात्मक राहिले आहे, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे.

Comments
Add Comment

Virat Kohli : विराट कोहलीच्या नवव्यांदा ५०० धावा पूर्ण

धरमशाला : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये विराट कोहली याने तगड्या

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा