मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले आहे. रहाणे हा भारतीय संघासाठी निःस्वार्थपणे खेळणारा क्रिकेटपटू होता आणि त्याला त्याच्या कामगिरीचे हवे तेवढे श्रेय कधीच मिळाले नाही, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. (Sunil Gavaskar on Ajinkya Rahane)
आपल्या साप्ताहिक सदरात लिहिताना गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, रहाणेने नेहमी संघहिताला प्राधान्य दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 10 कसोटी सामने खेळले, त्यापैकी चार सामने जिंकले आणि एकही सामना गमावला नाही. एवढा प्रभावी विक्रम असूनही त्याच्या नेतृत्वाची पुरेशी दखल घेतली गेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन डायमंड लीग ('ॲथलेटिसिमा') स्पर्धेत सहभागी ...
राहुल द्रविडशी केली तुलना :
रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाची तुलना करताना गावसकर यांनी भारताचे माजी प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा उल्लेख केला. द्रविडलाही कर्णधार म्हणून महत्त्वाचे यश मिळाले होते, मात्र त्यालाही त्याचे योग्य श्रेय मिळाले नव्हते. रहाणेचे नेतृत्वही त्याचप्रमाणे शांत, संयमी आणि प्रभावी होते. दबावाच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची त्याची क्षमता संघासाठी मोठी ताकद ठरली, असे (Sunil Gavaskar) गावसकर यांनी नमूद केले. (Sunil Gavaskar on Ajinkya Rahane)
ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयाची आठवण :
गावसकर (Sunil Gavaskar) यांनी २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. अॅडलेड कसोटीत भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आणि विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर रहाणेने संघाची धुरा सांभाळली. मेलबर्न कसोटीत त्याने शतकी खेळी साकारत भारताला दमदार पुनरागमन करून दिले. त्यानंतर भारताने मालिका २-१ ने जिंकत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. (Sunil Gavaskar on Ajinkya Rahane)
नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आपल्या दमदार गोलंदाजीसह बिनधास्त स्वभावामुळेही कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर ...
'संघ प्रथम' हीच रहाणेची ओळख :
गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते, रहाणेने (Ajinkya Rahane) कधीही वैयक्तिक प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. नम्रता, शिस्त आणि संघभावना हीच त्याची खरी ताकद होती. तो नेहमीच संघाच्या यशाला स्वतःच्या कामगिरीपेक्षा अधिक महत्त्व देणारा खेळाडू होता. रहाणेच्या निवृत्तीनंतर गावसकर यांनी व्यक्त केलेल्या भावना भारतीय क्रिकेटमध्ये शांतपणे मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या श्रेयाबाबत नव्याने चर्चा सुरू करणाऱ्या ठरल्या आहेत. (Sunil Gavaskar on Ajinkya Rahane)