Pune: पुण्यातील धक्कादायक घटना; तरुणीचं भररस्त्यात अपहरण

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भरदिवसा एका २१ वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात तरुणांनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्याच्या स्वामी चिंचोली परिसरात ही घटना घडली आहे. भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. २१ वर्षीय तरुणी आपल्या दुचाकीवरून चालली होती, त्यावेळी दोन तरुण तिथे आले आणि त्यांनी आई व भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकून अपहरण केलं.

अपहरण झालेली तरुणी ही आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी आरोपी जहीर शेख आणि अयान शेख या दोन आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळायच्या आत आरोपींनी अपहरण झालेल्या तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल चटणी फेकली, ज्यामुळे त्यांना काहीही दिसणे अशक्य झाले. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी २१ वर्षीय तरुणीचं अपहरण केले आणि तिथून पळ काढला.

तरुणीच्या आई आणि भावाने आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिकांनी दोघांची मदत केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. अपहरण झालेल्या तरुणीच्या आई आणि भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. तपासकामी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. ​टोल नाके आणि मुख्य रस्त्यांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. याप्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झालेत त्यांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर येते गर्दी केली आहे.
Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू