Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा गैंगमध्ये वर्चस्वाच्या वादातून मध्यरात्री झालेल्या संघर्षात तीन जणांची हत्या झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकाची तर चक्क शासकीय रुग्णालयात घुसून हत्या करण्यात आली.


अरिजितसिंग गजानन चव्हाण (२५, रा. बालाजीनगर, नांदेड) तर दुसऱ्या टोळीतील सय्यद आवेज सय्यद खलील (२७) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (२३, रा. देगलूर नाका, नांदेड) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. नांदेड शहर या टोळीयुद्धाने हादरले असून शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.


घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील साईलाला आणि सदा टोळीत गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. या दोन्ही टोळ्यांमध्ये यापूर्वीही अनेकवेळा संघर्ष उडालेला आहे. दरम्यान सदा टोळीचा अरिजितसिंग चव्हाण हा शुक्रवारी रात्री कॅनाल रोडावील ई-स्क्वेअर परिसरात आपल्या दोन साथीदारांसह धुरंदर हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. रात्री दीड वाजता चित्रपट संपल्यानंतर तो साथीदारांसह घराकडे निघताच आधीपासून तेथेच दबा धरून बसलेल्या साईलाला टोळीच्या आरोपींनी आवेज आणि अरचाजने अरिजितसिंगला आडविले आणि अचानक त्याच्यावर खंजरने हल्ला चढविला. काही क्षणातच अरिजितसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अरिजितच्या साथीदारांनीही धारदार शस्त्राने हल्ले केले.



रुग्णालयात बेडवरच केली हत्या :


अरिजितसिंगवर हल्या झाल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ राजेश चव्हाण हा टोळीतील काही साथीदारांसह रुग्णालयात दाखल झाला. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे त्याला कळताच त्याच्या बाजूच्याच बेडवर उपचारासाठी ठेवलेला आवेज जिवंत असल्याचे कळताच चाकू काडून आवेजवर रुग्णालयातच सपासप वार केले. या हल्ल्यात आवेजचाही मृत्यू झाला.


आधी रस्त्यावर आणि नंतर रुग्णालयातच घडलेल्या या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली. रुग्णालयात एकच धावपळ उडाली. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तेथे उपस्थित पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले. नंतर रुग्णालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Comments
Add Comment

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला

Pratap Sarnaik : 'एसटी'चा प्रवास महागणार?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत; ३१ मेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका मुंबई : अमेरिका आणि इराणमधील

Chandrashekhar Bawankule : भर कार्यक्रमात महसूलमंत्र्यांना कागदाने वारा! अमरावतीच्या जनता दरबारातील 'तो' व्हिडिओ चर्चेत

अमरावती : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका अनोख्या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील