भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या कथेशी मिळतीजुळती अशी घटना वास्तवात अलीकडेच मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये घडली.


भोपाळमध्ये ४२ वर्षांचा सरकारी अधिकारी त्याचे काम व्यवस्थित करत होता. या अधिकाऱ्याच्या विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला हा अधिकारी आवडू लागला. हळू हळू दोघांमधील जवळीक वाढली. कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झाले. या प्रेमापोटी सरकारी अधिकारी स्वतःच्या घरी कमी वेळ देऊ लागला. यातून घरी वाद वाढले. परिस्थिती बिघडत गेली. अखेर अधिकाऱ्याच्या १६ आणि १२ वर्षांच्या मुलींपैकी मोठ्या मुलीने न्यायालयात दाद मागितली.


न्यायालयात सुनावणी सुरू झाली त्यावेळी ४२ वर्षीय अधिकाऱ्याने आपले कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर प्रेम असल्याची कबुली दिली तसेच पत्नीसोबत राहण्याची इच्छा नाही असेही सांगितले. त्याचवेळी मुलींवर प्रेम आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याची तयारी दाखवली. अधिकाऱ्याच्या प्रेमात असलेल्या महिलेनेही नात्याची कबुली दिली आणि प्रियकराने मुलींच्या भविष्यासाठी नियोजन केल्यास हरकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून तडजोड केली. पत्नीने घटस्फोट घेण्याच्या बदल्यात स्वतःसाठी आणि पोटच्या दोन मुलींसाठी एक डुप्लेक्स फ्लॅट आणि २७ लाखांची रोख रक्कम अशा एकूण दीड कोटी रुपयांची मागणी केली. पतीच्या प्रेयसीने ही किंमत मोजण्याची तयारी दाखवली. यानंतर परस्पर सहमतीने घटस्फोट झाला.


लग्नानंतरच्या प्रेमातून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी भोपाळमध्ये दीड कोटी रुपयांत झालेला हा पहिलाच घटस्फोट आहे. यामुळे पत्नीने दीड कोटी रुपयांत प्रेयसीला पती विकल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.


श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांच्या जुदाई सिनेमात पैशांच्या लालसेतून श्रीदेवी पतीला दूर करते आणि नंतर तिला चुकीची जाणीव होते असे दाखवले होते. भोपाळच्या घटनेत पती आणि पत्नी यांच्या जुदाईचे कारण पती आणि त्याची प्रेयसी यांच्यातील नाते आहे. भोपाळच्या महिलेने वास्तवाचे भान राखून स्वतःच्या आणि मुलीच्या भविष्याच्या विचार करून घटस्फोट घेतला आहे. पण या घटनेच्या निमित्ताने बदलत्या कौटुंबिक नातेसंबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०

IND vs PAK : पाकिस्तानचा पराभव होताच मोहसीन नक्वी मागच्या दाराने पळाला

मुंबई: श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर भारताने पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला आहे. भारताने

Manipur: मणिपूरमध्ये वेगवेगळ्या कारवाईत १० दहशतवाद्यांना अटक

गेल्या २४ तासांत मणिपूरच्या विविध भागात पोलिस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांसह दहा

Kedarnath Dham: महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथ संस्थेने केली मोठी घोषणा; केदारनाथ धामचे दरवाजे 'या' दिवशी उघडणार

रविवार १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने केदारनाथ संस्थेकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या

Indian Student in America: कॅलिफोर्नियामध्ये बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सहा दिवसांनी सापडला

बंगळुरू: अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात बेपत्ता झालेल्या २२ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला