AC Local : पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना मोठा दिलासा! १९ फेब्रुवारीपासून धावणार १२ नवीन एसी लोकल; लोकल फेऱ्यांमध्येही वाढ

मुंबई : मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुखकर आणि गारवा देणारा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी १९ फेब्रुवारीपासून १२ नवीन एसी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलची वाढती मागणी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. एसी लोकलसोबतच प्रशासनाने ३ नवीन नॉन-एसी (साध्या) लोकल फेऱ्यादेखील वाढवल्या आहेत. या निर्णयामुळे आता पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १४१४ वर पोहोचली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाचे विविध आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देणे, तसेच पीक अवर्समधील गर्दीचे नियोजन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. १९ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या नवीन वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता आणखी गतिमान आणि आरामदायी होणार आहे.



पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारही धावणार जादा एसी लोकल


पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या लोकल सेवेत मोठे बदल केले असून, एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता एसी लोकलची एकूण संख्या १२१ वरून १३३ वर पोहोचली आहे. यामध्ये ११ साध्या लोकलच्या जागी एसी सेवा सुरू करण्यात येणार असून, एक पूर्णपणे नवीन एसी फेरी वाढवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी धावणाऱ्या एसी लोकलची संख्या आता ७७ वरून थेट १०६ करण्यात आली आहे. यामुळे सुट्टीच्या दिवशी फिरणाऱ्या प्रवाशांना गारेगार प्रवास करता येईल. पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल सेवांची संख्या आता १४१० वरून १४१४ झाली आहे. वांद्रे ते भाईंदर दरम्यान धावणारी लोकल आता थेट विरारपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे विरारच्या प्रवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हे सर्व बदल १९ फेब्रुवारीपासून लागू होणार असून, यामुळे कार्यालयीन वेळेसह सुट्टीच्या दिवशीही प्रवाशांची गर्दी विभागली जाण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल