मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने सुरु व्हायचा. उबाठाच्या काळातील हा इतिहास आता महायुती पुसून टाकणार असून यापुढे महापालिकेचे सभागृह नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे गटनेते घड्याळाच्या काट्यावर सुरु करून सदस्यांना जास्तीत सभागृहात बोलण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.


मुंबई महापालिकेच्या सभागृहाची लया मागील काही वर्षांपासून तत्कालिन सत्ताधारी उबाठाच्या महापौरांनी घालवली असून प्रत्यक्षात पहिल्या निश्चित केलेल्या सभेचे कामकाजही वेळेत सुरु करण्यात येत नव्हती. दुपारी अडीच वाजता सुरु होणारे सभागृह हे प्रत्यक्षात नगरसेवक सभागृहात उपस्थित असूनही महापौर हे सभागृहात उशिराने येत असत. त्यामुळे सभागृह तब्बल दीड ते तास उशिराने सुुरु होण्याची प्रथा मागील काही वर्षांमध्ये उबाठाच्या महापौरांनी घातली होती. तसेच सभागृहामध्ये विविध विषयांवर सदस्यांना चर्चा करू न देता त्यांचा बोलण्याचा हक्कही हिरावून घेतला जात होता. त्यामुळे बहुतांशी नगरसेवकांना मागील नगरसेवक काळात संसदीय कार्यप्रणाली समजून घेता आलेली नाही तसेच आपले प्रश्न आणि समस्याही मांडता आल्या नाहीत.


मात्र, उबाठाची सत्ता जावून आता भाजप आणि शिवसेना महायुतीची सत्ता महापालिकेत आल्यानंतर त्यांनी यापूर्वीचा इतिहास आता पुसून नव्याने इतिहास लिहिणार आहेत. यामध्ये सभागृह भरण्याची वेळ दुपारी दोन वाजता देवून प्रत्यक्षात ठिक अडीच वाजता सभागृह सुरु केले जाईल अशाप्रकारची रणनिती आखली आहे.भाजपचे गटनेते आणि भावी सभागृहनेते गणेश खणकर आणि शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी यापुढे ठिक अडीच वाजताच सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करून प्रत्येक विषयांवर साधक बाधक चर्चा करून यामध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांना भाग घेता येईल अशाप्रकारे सभागृह चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. त्यामुळे ज्या उबाठाच्या यापूर्वीच्या महापौरांनी सभागृहात चर्चा न करता कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला होता, तिथे आता महायुतीने खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याची पूर्ण संधी देणार आहेत,तसेच वेळेत सभागृहाचे कामकाज सुरु करून वेळेत संपवून लांबच्या नगरसेवकांना गर्दीविना घरी जाण्यास देणार आहे.


महापालिकेतील पहिली निश्चित केलेली सभा ही महत्वाची असून ती कोणत्याही कारणांशिवाय घ्यावी लागते. त्यानंतर दुसऱ्या सभेमध्ये ठरावाच्या सूचनांसह इतर कामकाज तसेच त्यानंतर तहकूब सभा अशाप्रकारे पाच ते आठ सभा किंवा त्यापेक्षा अधिकही घेता येवू शकतात. पण उबाठाच्या काळात तीनच्या वरही सभा घेण्यात आली नव्हती, त्यातुलनेत अधिक सभा घेण्याचा महायुतीच्या गटनेत्यांनी विचार प्रकट केला आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Metro : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९, डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो-२ बीचे उद्घाटन ६ एप्रिलला

मुंबई : मुंबईत मेट्रोचे जाळे झपाट्याने पसरत आहे. दरम्यान, आता दोन मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर

सात जिल्ह्यांचे कलेक्टर बदलले; २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरू ठेवले असून, गुरुवारी विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे

Mumbai : अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : अनधिकृत बांधकाम केल्यास किंवा त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा आणल्यास

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १

राज्याच्या महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार ३५ हजार ८७६ पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

मुंबई : राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल