उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर भारतीय संघ नामिबियाला पराभूत करून नुकताच श्रीलंकेला पोहोचला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. असे असताना भारतीय संघाला २८ वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिकची भीती आहे. कारण त्याची अनोखी गोलंदाजी शैली फलंदाजांना कळणे कठीण जात आहे.


टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत उस्मान तारिकने या स्पर्धेत एकच सामना खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. त्यात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडचणीत येत असल्याचे दिसून आले आहे. त्यात उस्मानची गोलंदाजी शैली भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते. गोलंदाजी करताना त्याचा हात खालून येतो. त्याला साइट आर्म असे म्हटले जाते. तसेच चेंडू सोडताना थोडा थांबतो. त्यामुळे चेंडू सावकाश येतो. पण या दरम्यान, वेगाने टाकण्याची कलाही त्याने आत्मसात केली आहे. इतकेच काय चेंडू वळतो देखील. त्यामुळे फलंदाजी करताना त्याचा अभ्यास करणे कठीण जाणार आहे.


उस्मान तारिकने एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या हातात दोन कोपरं आहे. त्यामुळे माझा हात नैसर्गिकरित्या वाकतो. माझी चाचणी झाली असून मी निर्दोष ठरलो आहे. प्रत्येकाला वाटते की, मी हात वाकवतो. पण माझा हात जैविक कारणाने वाकतो.’ हातातलं वेगळेपण त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळे करते. त्याचा उस्मान तारिक पुरेपूर फायदा घेत आहे. दुसरीकडे, उस्मान दुबईत सेल्समनचे काम करत होता. त्याच्याकडे चांगली नोकरी होती. पण क्रिकेटचे वेड काही सुटत नव्हते. यावेळी त्याने एमएस धोनीचा बायोपिक पाहिला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. धोनीने तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केले होते. तसेच उस्मान नोकरी सोडून पाकिस्तानला परतला आणि क्रिकेट खेळू लागला.

Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला