महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना सांगितले की, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ हजार ९२६ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.


ही रक्कम २०१४-१५ ते २०१९-२० या काळात महाराष्ट्राला दरवर्षी दिलेल्या सरासरी १,१७१ कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा जवळपास २० पट जास्त आहे. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे, त्यापैकी २ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर महाराष्ट्रात आहेत. मुंबई-पुणे: ४८ मिनिटे, पुणे-हैदराबाद: १ तास ५५ मिनिटे (२ तासांच्या आत) यांचा समावेश आहे.


पायाभूत सुविधांमध्ये १ लाख ७० हजार ०५८ कोटी रुपयांची एकूण कामे प्रगतीपथावर आहेत. या मोठ्या गुंतवणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे मार्ग निर्मिती, स्थानकांचा पुनर्विकास आणि सुरक्षा वाढवण्याच्या कामांचा समावेश आहे. अमृत स्टेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १३२ स्थानकांचा संपूर्ण पुनर्विकासासाठी निवड करण्यात आली आहे.


प्रीमियम ट्रेन सेवांच्या संचालनामुळे राज्यातील प्रवासाची कार्यक्षमता नवीन उंचीवर पोहोचली असून वंदे भारत एक्सप्रेस(१२ जोड्या),अमृत भारत एक्सप्रेस(५ जोड्या) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये रेल्वे जाळ्याचा वेगाने विस्तार झाला आहे. सन २०१४ पासून, अंदाजे २,४०० किमी लांबीचे रेल्वे मार्ग बांधण्यात आले आहेत. हे मलेशियाच्या संपूर्ण रेल्वे जाळ्यापेक्षा जास्त आहे.


रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी १,२२८ उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधले आहेत. ४९७१ आरकेएम मार्गावर कवच प्रणाली मंजूर आहे, त्यापैकी ५७६ आरकेएमवर ती आधीच कार्यान्वित करण्यात आली आहे आणि ३६१७ आरकेएमचे काम/निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध