मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार पद्धती आणि सातत्यपूर्ण रुग्ण सहाय्य व पाठपुरावा करण्यात येतो. परिणामी, औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर गेल्या ८ वर्षात दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहचला असल्याचा दावा महापालिका आरोग्य विभागाने केला आहे. जागतिक क्षयरोग दिन २४ मार्च रोजी असून विविध आरोग्य संस्थांमध्ये वर्ष २०२५ मध्ये मुंबईत एकूण ५४ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची संख्या नोंदवली गेली. पैकी ४८ हजार ८३५ रुग्ण मुंबईचे रहिवासी होते. यापैकी ४० टक्के रुग्ण एक्स्ट्रा पल्मनरी, ६ टक्के बालरुग्ण आणि ८ टक्के औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे प्रकारातील होते,असे आरोग्य विभागाने नमुद केले आहे.


राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने २०२५ मध्ये “क्षयरोग (TB) मुक्त भारत अभियान” सुरू केले. या कार्यक्रम अंतर्गत १३ लाख ८ हजार २०० संवेदनशील लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ लाख २४ हजार ७७४ संशयित रुग्णांचे एक्स-रे करण्यात आले.


मुंबईतील आरोग्य संस्थांच्या ठिकाणी ४५ आणि ३४ पोर्टेबल मशीन उपलब्ध आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग व रीफॅम्पीसीन औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे मोफत व अचूक निदान केले जाते. तसेच आता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून ४ पॅथोडिटेक्ट मशीनही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संयंत्राद्वारे क्षयरोग तसेच रीफॅम्पीसीन व आयसोनाझेड औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचेही निदान करणे होईल. सध्या २ पॅथोडिटेक्ट संयंत्रे सर जे. जे. रूग्णालय व आयआरएल जीटीबी प्रयोगशाळेत उपलब्ध झाली आहेत. वर्ष २०२५ मध्ये एकूण २ लाख मॉलीक्यूलर चाचण्या करण्यात आल्या.


उच्च जोखीम घटक ओळखून योग्य उपचारासाठी ही सेवा दिली जाते. या सेवेअंतर्गत १९,१७२ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईत ३१ डिआर टीबी क्लिनिकमधून मोफत उपचार व औषध दुष्परिणाम व्यवस्थापन सेवा दिली जाते. ६ महिन्यांची प्रगत उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत १०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत.



पौष्टिक आहार किट


निक्षय मित्रांच्या माध्यमातून दरमहा टीबी रुग्णांना सहा महिन्यांकरिता पौष्टिक आहार किट देण्यात येते. मागील २ वर्षांत निक्षय पोषण योजने अंतर्गत एकूण १,४८,८६७ रेशन किट वितरित करण्यात आले.



क्षयरोगाची १० लक्षणे


दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला,ताप,वजन घटणे,रात्री घाम येणे,भूक न लागणे,छातीत दुखणे,श्वास घेण्यास त्रास,रक्त किंवा कफ खोकल्यातून येणे,थकवा,मानेला सूजवरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी जवळच्या बीएमसी दवाखाना, हेल्थ पोस्ट किंवा “आपला दवाखाना” येथे जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घ्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


 

 
Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा