गर्दी कमी होणार? मुंबई लोकलमध्ये एसी ट्रेन वाढणार ; लवकरच धावणार १५ डब्ब्यांची लोकल

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठी आणि ठोस पाऊले उचलली आहेत. येत्या काही वर्षांत मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असून, सन २०२९ पर्यंत तब्बल २३८ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवेत दाखल होणार आहेत. त्याचबरोबर १५ डब्यांच्या लोकल ट्रेन येत्या जून महिन्यापासून धावण्याची शक्यता आहे.


मुंबई लोकल ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, दररोज वाढणारी प्रवासी संख्या, अपघात आणि असुविधांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने रेल्वे पायाभूत सुविधांवर भर देण्याचा निर्णय घेतला असून, नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्कसाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.



जूनपर्यंत १५ डब्यांच्या लोकल रुळांवर


प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि क्षमतेत वाढ करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सेवेसाठी आवश्यक असलेले फलाट वाढवण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबई विभागातील ३४ रेल्वे स्थानकांवर फलाटांचे विस्तारीकरण केले जात असून, जून महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.



मार्चपासून सेफ्टी डोअर लोकलची चाचणी


प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत, दोन सेफ्टी डोअर असलेल्या लोकल ट्रेन मार्च महिन्यापर्यंत ट्रायल बेसिसवर सुरू केल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे धावत्या लोकलमधून पडण्याच्या घटना रोखण्यास मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.



२०२९ पर्यंत २३८ एसी लोकल


मुंबईकरांच्या प्रवासाला गारवा देण्यासाठी २०२९ पर्यंत २३८ एसी लोकल ट्रेन सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गर्दीच्या वेळेतही प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, पूर्व आणि पश्चिम रेल्वे मार्गांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विशेष कॉरिडॉर विकसित केला जाणार असून, मालवाहतुकीलाही चालना मिळणार आहे

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : परदेश दौरे रद्द करा, मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही कमी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांच्या लवाजम्याचा आढावा घेण्यास

Reserve Bank of India (RBI) : रिझर्व्ह बँकेकडून सर्वोदय सहकारी बँकेचा परवाना रद्द

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (RBI) मुंबईतील 'सर्वोदय सहकारी बँके'चा परवाना अखेर रद्द केला आहे. बँकेकडे

Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे

BMC News : माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा तातडीने पुरवा ; स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई: मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे माहुल येथील एसआरए प्रकल्पांतर्गत बांधण्यात

BMC : पहाटेच पोहोचल्या महापालिका आयुक्त सफाई कामगारांच्या भेटीला...

मुंबई :  असे म्हटले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य निरोगी

BMC News : महापालिका आयुक्त जेव्हा पहाटेच कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंडवर पोहोचतात, तेव्हा...

मुंबई: मुंबईकर जेव्हा गाढ झोपेत किंवा कुणी लवकर उठून मॉर्निंग वॉकला फिरत असतात,त्यावेळेस मुंबई महापालिकेच्या