अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (पीएसओ) विदीप दिलीप जाधव यांना त्यांच्या मूळ गावी सातारा येथे काल रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता.

बारामतीत बुधवारी कोसळलेल्या चार्टर्ड विमानात विदीप जाधव यांचा समावेश होता. या दुर्दैवी अपघातात विमानातील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

जाधव यांचे पार्थिव गावात पोहोचताच वातावरण करुण झाले. नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचित मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी जाधव यांच्या लहान मुलाने मुखाग्नी दिला, त्या क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि कर्तव्यनिष्ठ सुरक्षा रक्षक म्हणून विदीप जाधव ओळखले जात होते. आपल्या कामाप्रती प्रामाणिक आणि जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी