अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पार्थिवावर साताऱ्यात अंत्यसंस्कार

मुंबई : बारामती येथील भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्राण गमावलेले त्यांचे वैयक्तिक सुरक्षा रक्षक (पीएसओ) विदीप दिलीप जाधव यांना त्यांच्या मूळ गावी सातारा येथे काल रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला होता.

बारामतीत बुधवारी कोसळलेल्या चार्टर्ड विमानात विदीप जाधव यांचा समावेश होता. या दुर्दैवी अपघातात विमानातील सर्व पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी समजताच जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

जाधव यांचे पार्थिव गावात पोहोचताच वातावरण करुण झाले. नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचित मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी जाधव यांच्या लहान मुलाने मुखाग्नी दिला, त्या क्षणी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि कर्तव्यनिष्ठ सुरक्षा रक्षक म्हणून विदीप जाधव ओळखले जात होते. आपल्या कामाप्रती प्रामाणिक आणि जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०