बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच अपघातात अजित पवार यांचे सुरक्षारक्षक पोलीस हवालदार (पर्सनल सेक्युरिटी ऑफीसर, पीएसओ) विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला. ते ४३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी संध्या (३८), मुलगी नेत्रा (१४) आणि मुलगा अद्वीत (१०) असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ते वास्तव्याला असलेल्या ठाण्यातील विटावा भागात शोककळा पसरली आहे. राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळेच मंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती दौरा होता. याच दौऱ्यामध्ये मुंबई पोलीस दलातील हवालदार जाधव यांचीही त्यांच्यासमवेत पीएसओ म्हणून डयूटी होती. बुधवारी सकाळी ८.१० चे विमानाचे मुंबईतून टेक ऑफ असल्यामुळे जाधव यांना मुंबईत ५.३० वाजता पोहोचायचे होते. ते कौटुंबिक कार्यक्रमासाठी मंगळवारी खारीगाव येथील त्यांच्या सासूरवाडीमध्ये गेले होते. तिथूनच ते बुधवारी पहाटे ४ वाजता डयूटीसाठी रवाना झाले. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचीच माहिती समजताच जाधव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. जाधव हे विटावा येथील सूर्यानगर परिसरातील साई कृष्ण विहार इमारतीच्या बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरड गावचे ते रहिवासी होते. विदीप यांच्या निधनाची माहिती समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

Comments
Add Comment

शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी रायगडवरील 'ही' महत्त्वाची सेवा सहा दिवस पूर्णपणे बंद

पुणे: शिवप्रेमी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या किल्ले रायगडावरील रोप-वे सेवेबाबत प्रशासनाने एक महत्त्वाची

Pune Girl Kidnapping Case Update: पुणे अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; अपहरण झालेल्या मुलीचे अन् आरोपीचे...

पुणे: पुण्याच्या भिगवण बाजारपेठेतून २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर

Gold Silver Price: सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; २२ आणि २४ कॅरेटचे दर तपासा

मुंबई: गेल्या दोन दिवस शांत बसलेल्या सोन्याने आज पुन्हा एकदा जोरात गती पकडली असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

काळा घोडा महोत्सवात महिला बचत गटांची चांदी; तब्बल ९ दिवसांमध्ये कमवले साडेआठ लाख रुपये

मुंबई: मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेला काळा घोडा कला महोत्सव २०२६ मध्ये यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक

Surya Grahan 2026: दुर्मीळ योग! माघ अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी; काय खावे आणि काय टाळावे?, जाणून घ्या...

मुंबई: खगोलीय घटनांच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष विशेष ठरणार आहे. या वर्षात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण

डोंबिवलीमध्ये रंगणार 'द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह'

मुंबई: शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे