अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना मूळ कर रकमेवर ५०% शास्ती मिळणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील यांनी केले आहे. ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित करदारांनी नगर परिषदेच्या मालमत्ता कर विभागाशी संपर्क साधावा किंवा नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन थकबाकी रक्कम जमा करावी. या योजनेमुळे नागरिकांवरील आर्थिक भार कमी होईल आणि कर वसुलीला प्रोत्साहन मिळून नगर परिषदेच्या महसुलात वाढ होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणेकरांनो, आता ट्रॅफिकमध्ये अडकणं विसरा! घोडबंदर रोडच्या रस्ता रुंदीकरणासाठी DCM शिंदेंचा अल्टिमेटम

मुंबई आणि महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आपला यंदाचा

डोंबिवलीत बंद फ्लॅटवर चोरट्यांची नजर; लाखो रुपयांचा ऐवज गायब

डोंबिवली : शहरात अलीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. भरवस्तीतील बंद घरांवर लक्ष ठेवून

Thane Belapur Traffic Jam : कळवा-ऐरोली 'चक्काजाम'! ठाणे-बेलापूर पट्ट्यात मोठी वाहतूक कोंडी, ऑफिसला जाणाऱ्यांना बसतोय 'लेटमार्क'

ठाणे : आज सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका भीषण

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट