नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील तोडक कारवाईविरोधात गेल्या दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू होते. मात्र, जनभावना लक्षात घेऊन या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल पार्क परिसरात आदिवासी आणि वनविभाग यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष सुरू होता. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादही झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, आंदोनकांनी माघार घेतली.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – गणेश नाईक

मंत्रालयातील बैठकीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “नॅशनल पॉर्कमध्ये अतिक्रमणाची कारवाई न्यायालयाच्या आदेशान्वये सुरू होती. मात्र, विषयांचे गांभीर्य लक्षात घेता, कारवाई स्थगित करण्यात आली आहे. आता याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल. वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना हा विषय समजून घेण्याची सूचना केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत आदिवासी बांधवांची समजूत काढली जाईल आणि या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढला जाईल. मात्र, काही लोकांनी जी दगडफेक केली, ती उचित नाही. सरकार आमदार किंवा मंत्र्यांचे नाही, जनतेचे आहे. त्यामुळे जनतेने संयम बाळगला पाहिजे”, असे आवाहन देखील नाईक यांनी केले.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य