नॅशनल पार्कमधील आदिवासी पाड्यांवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील तोडक कारवाईविरोधात गेल्या दोन दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू होते. मात्र, जनभावना लक्षात घेऊन या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल पार्क परिसरात आदिवासी आणि वनविभाग यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष सुरू होता. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादही झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, आंदोनकांनी माघार घेतली.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – गणेश नाईक

मंत्रालयातील बैठकीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “नॅशनल पॉर्कमध्ये अतिक्रमणाची कारवाई न्यायालयाच्या आदेशान्वये सुरू होती. मात्र, विषयांचे गांभीर्य लक्षात घेता, कारवाई स्थगित करण्यात आली आहे. आता याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल. वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांना हा विषय समजून घेण्याची सूचना केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत आदिवासी बांधवांची समजूत काढली जाईल आणि या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढला जाईल. मात्र, काही लोकांनी जी दगडफेक केली, ती उचित नाही. सरकार आमदार किंवा मंत्र्यांचे नाही, जनतेचे आहे. त्यामुळे जनतेने संयम बाळगला पाहिजे”, असे आवाहन देखील नाईक यांनी केले.
Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०