Pandhapur Accident: मुंबईवरुन विठुरायाच्या दर्शानासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघात; चौघांचा दुर्दैवी मृत्यु

पंढरपूर : मुंबईहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघाताची घटना मंगळवेढ्याजवळ येथे घडली आहे.या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या भीषण अपघातात १४ वर्षाची लहान मुलीसह तीन महिलांचा ही समावेश आहे व पाच ते सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पंढरपूर–सोलापूर महामार्गावर मंगळवेढ्याजवळील शरद नगर, मल्लेवाडी परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणारे भाविक क्रुझर गाडीने मंगळवेढा मार्गे जात होते. याच दरम्यान ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने भरधाव वेगात व चुकीच्या दिशेने येत क्रुझर जीपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात योगिनी केकाणे, सोनम अहिरे, आदित्य गुप्ता आणि सविता गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजली यादव, सोहम घुगे यांच्यासह इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती लवकरच सुरळीत केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर ट्रकचा क्रमांक hh ४६ bu-६६५१ असून चालक युवराज यशवंत गळवे याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे