उल्हासनगरमध्ये नगरसेवकांचा मुक्काम रिसॉर्टमध्ये

फोडाफोडीचे राजकारण; भाजप-शिवसेनेचा बचावात्मक उपाय


उल्हासनगर : महापौरपदासाठी उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामुळे नगरसेवक फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्षांनीच खबरदारी घेतली असून, ‘फोडाफोडी’च्या भीतीने काही नगरसेवकांना रिसॉर्टमध्ये हलविण्याच्या चर्चाही सुरू आहेत. महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून त्यापैकी भाजपकडे ३७ आणि शिंदेसेनेकडे ३६ नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी ४० हा ‘मॅजिक फिगर’ आवश्यक आहे.


शिवसेनेने महापौरपदासाठी वंचित बहुजन आघाडी (२ जागा), साई पक्ष (१ जागा) आणि अपक्ष (१ जागा) यांचा पाठिंबा मिळवून ४० नगरसेवकांचा आधार मिळविला आहे. शिंदेसेनेच्या पॅनलमध्ये खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा केला आहे. मात्र, भाजपकडूनही पडद्यामागे सक्रिय हालचाली सुरू असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढण्याची शक्यता असून, दोन्ही पक्षांतून नगरसेवकांना स्थिर ठेवण्यासाठी तणावग्रस्त वातावरण सुरू आहे.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या