Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले असून, नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात संदीप पाटील नावाच्या व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरादार आणि कमकेरी हे आपल्या पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कर्नाटक पोलिसांनी थेट नाशिकमध्ये येऊन तपास सुरू केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.


या कथित लुटीप्रकरणी सध्या पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ही लूट नेमकी कशी झाली, ट्रक कुठून निघाला आणि त्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. नाशिक आणि बेळगाव पोलिसांमधील समन्वयातून सुरू असलेल्या तपासामुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. संशयितांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मात्र, या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी ४०० कोटी रुपयांच्या कंटेनर लुटीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चोर्ला घाट परिसरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून यासंदर्भात एक पत्र प्राप्त झाले असून, त्याला अधिकृत उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे या प्रकरणातील गूढ अधिकच गडद झाले आहे.


दरम्यान, या कथित लुटीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. ४०० कोटी रुपयांच्या नोटांमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या ‘साहेबांचा’ हात असल्याची कुजबूज सुरू आहे. या प्रकरणाची दखल मुंबई पोलीस मुख्यालयात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.

Comments
Add Comment

फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि

Droupadi Murmu:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी; ममता बॅनर्जींबाबत काय म्हणाल्या?

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) या त्यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात

Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे.

उत्पादनांच्या निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी, राज्याच्या अर्थव्यवस्थेला लघुउद्योगांचा मोठा आधार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील उद्योग क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी गेल्या

इराणमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

तेहरान (वृत्तसंस्था): अमेरिका आणि इस्रायलसोबत तणावपूर्ण परिस्थिती असताना इराणमध्ये शनिवारी भूकंपाचे सौम्य

सर्वच बँकांचे पीक कर्ज माफ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नगर (प्रतिनिधी) : ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांना