उत्पादनांच्या निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी, राज्याच्या अर्थव्यवस्थेला लघुउद्योगांचा मोठा आधार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील उद्योग क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी गेल्या पाच वर्षांत राज्याच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला आहे. राज्याच्या ताज्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०२० ते २०२५ या काळात उद्यम पोर्टलवर तब्बल ६३.८५ लाख उद्योगांची नोंदणी झाली असून, या क्षेत्राच्या माध्यमातून सुमारे २ कोटी ५२ लाख जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, या औद्योगिक वाढीमुळे राज्याच्या निर्यातीचा आलेखही उंचावला असून, देशाच्या एकूण निर्यातीत १५ टक्के वाटा उचलत महाराष्ट्राने दुसरे स्थान कायम राखले आहे.



अहवालानुसार, सूक्ष्म उद्योगांनी रोजगाराच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात ६२.११ लाख सूक्ष्म उद्योगांची नोंदणी झाली असून, त्यातून २ कोटी १२ लाख जणांना रोजगार मिळाला आहे. लघु उद्योगांच्या माध्यमातून २४.२८ लाख, तर मध्यम उद्योगांच्या माध्यमातून १५.६० लाख हातांना काम मिळाले आहे. सरकारच्या विविध प्रोत्साहनपर योजनांमुळे या क्षेत्राचा आलेख उंचावल्याचे निरीक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे.


राज्यातून होणाऱ्या निर्यातीनेही यंदा ५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. २०२४-२५ मध्ये ५.५७ लाख कोटींची निर्यात झाली असून, २०२५-२६ च्या नोव्हेंबरपर्यंतच ४ लाख कोटींच्या निर्यातीचा पल्ला गाठण्यात यश मिळाले. यात अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वाधिक ३४ टक्के वाटा आहे. त्याखालोखाल रत्ने आणि आभूषणे २१ टक्के आणि प्लास्टिक उत्पादनांचा निर्यातीतील वाटा सर्वात कमी म्हणजे २ टक्के इतका आहे.


पुणे विभाग : सूक्ष्म आणि मध्यम अशा दोन्ही श्रेणीत पुणे विभागाने बाजी मारली आहे. १५.६१ लाख सूक्ष्म उपक्रमांतून येथे ५७.९१ लाख जणांना रोजगार मिळाला आहे. लघु उद्योगांच्या बाबतीत मुंबई शहर आणि उपनगर आघाडीवर असून येथे ६० हजार ६९८ उद्योग कार्यरत आहेत. लघु उद्योगांतून मिळणाऱ्या रोजगारात छत्रपती संभाजीनगर विभागाने ८.१८ लाखांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. औद्योगिक नोंदणी आणि रोजगार निर्मिती या दोन्ही आघाड्यांवर अमरावती विभाग मात्र राज्याच्या सरासरीच्या तुलनेत मागे राहिल्याचे दिसून येते.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास