Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून काही ठिकाणी चाळीशीकडे झुकताना दिसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.



मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट :


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टी भागात ८ आणि ९ मार्च रोजी उष्ण व आर्द्र हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.



विदर्भात उष्णतेचा कहर :


विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमान सामान्यपेक्षा सुमारे पाच अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



पुण्यात सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी तापमान वाढलं :


पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.



मराठवाड्यातील तापमानातही लक्षणीय वाढ :


दरम्यान, मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर धाराशिवमध्ये ३६.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६ आणि उदगीर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून