Heat wave in Maharashtra : राज्यात पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून काही ठिकाणी चाळीशीकडे झुकताना दिसत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला असून काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.



मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट :


हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या किनारपट्टी भागात ८ आणि ९ मार्च रोजी उष्ण व आर्द्र हवामान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.



विदर्भात उष्णतेचा कहर :


विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. आज राज्यातील सर्वाधिक तापमान अमरावती येथे ४०.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस तापमान चाळीशी पार जाण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तापमान सामान्यपेक्षा सुमारे पाच अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.



पुण्यात सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी तापमान वाढलं :


पुणे शहरातही गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले असून येत्या काही दिवसांत ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.



मराठवाड्यातील तापमानातही लक्षणीय वाढ :


दरम्यान, मराठवाड्यातही तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परभणी येथे ३८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर धाराशिवमध्ये ३६.२, छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६ आणि उदगीर येथे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा