सर्वच बँकांचे पीक कर्ज माफ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नगर (प्रतिनिधी) : ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? याविषयीची संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. पण या कर्जमाफीचा लाभ कोणत्या बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जावर मिळेल याविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात होते. पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयीची स्थिती स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतो राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचे होणार नाही, कुणी म्हणतो या सोसायटीची होणार नाही, कुणी म्हणतो त्या सोसायटीची
होणार नाही.


पण सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही बँकेने दिलेले २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आमचा प्रयत्न हा आहे की, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे बँकेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा यासाठी काम सुरू आहे. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, ३० जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता ही घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्यामुळे पुढच्या कारवाईला सुरुवात होईल. समिती यावर काम करत आहे. ही समिती यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी सांगेल. मी एवढेच सांगतो की, ही कर्जमाफी यापूर्वीच्या सर्वच कर्जमाफीच्या निर्णयांहून चांगली आहे. लहरी हवामान, शेतमालाच्या घसरलेल्या किंमती, बी-बियाणे-खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही शिल्लक राहत नसून कर्ज वाढत चालल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचे गावागावांत स्वागत केले जात आहे.


इराण युद्धावर भीतीचे वातावरण तयार करू नका


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांना इराण विरुद्ध इस्त्रायल अमेरिका युद्धावर नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल असे चित्र निर्माण न करण्याचेही आवाहन केले. माझी माध्यमांना विनंती आहे की, नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण करू नये. जी काही परिस्थिती आहे, ती केंद्र सरकार हाताळत आहे. ती केंद्र सरकार सांगत आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार, ते घडणार असे सांगून नागरिकांच्या मनात भीती व संभ्रम तयार करणे हे देशाच्या व समाजाच्या नाही. केंद्र सरकारनेही काल हेच स्पष्टपणे सांगितले आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Russia-China Conflict : रशियाकडून चिनी मालवाहू जहाजावर हल्ल्याचा युक्रेनचा दावा; आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ

जगभरात खळबळ उडवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. युक्रेनने गंभीर आरोप करत दावा केला आहे की, रशियन ड्रोन हल्ल्यात

Bread Prices Rise In Mumbai : मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक कात्री; ब्रेडच्या दरात तब्बल ५ रुपयांची वाढ!

मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आता आणखी एक मोठी कात्री लागली आहे. आधीच दूध आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे

Pune Bastian Club : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील 'बॅस्टियन' क्लबमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील नाईटलाइफ (Video Viral On Social Media) आणि पब संस्कृती पुन्हा एकदा एका मोठ्या

Prashant Kishor : प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे राजकीय सल्लागार?

- सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्यासोबत बैठक; १ जूनपासून काम सुरू करणार मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर

Share Market : शेअर बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ३०० अंकांच्या जवळ, निफ्टीही वधारला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही देशांतर्गत शेअर बाजाराने मंगळवारी