Droupadi Murmu:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी; ममता बॅनर्जींबाबत काय म्हणाल्या?

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) या त्यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कोणताही मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते, ज्यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याने हि वागणूक खटकणारी आणि देशाच्या राष्ट्रपतींच अवमान असल्याची भावना आता सर्वस्थरातून व्यक्त केली जात आहे. याबाबत आता स्वत: द्रौपदी मुर्मू यांनी खंत बोलून दाखवली आहे.


राष्ट्रपतींनी याबाबत निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, "कदाचित त्या (ममता बॅनर्जी) माझ्यावर नाराज आहेत," वादाची पार्श्वभूमी आणि घटनाकार्यक्रमाचे ठिकाण बदलणे: मूलतः हे सम्मेलन गोसाईनपूर येथे आयोजित करण्यात आले होते, पण राज्य सरकारने ते बिधाननगर येथे हलवले. राष्ट्रपतींना अतिरिक्त ३० किलोमीटर प्रवास करावा लागला, अव्यवस्था झाली. यामुळे कमी लोक उपस्थित राहिले आणि राष्ट्रपतींनी याबाबत दुःख व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही. याबाबत राष्ट्रपतींनी स्वतः भाषणात उल्लेख केला आणि राज्य सरकारच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला.


यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "मी ममता बॅनर्जींना माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण कदाचित त्या माझ्यावर रागावल्या आहेत." हे वक्तव्य उत्तर बंगालमधील आदिवासी समाजासाठी आयोजित कार्यक्रमात केले गेले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर सडकून टीका केली आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारने "सर्व मर्यादा ओलांडल्या" असा आरोप केला. तर गृहमंत्री अमित शाह यांनी टीएमसीने "पातळी सोडली" असे म्हटले आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या प्रोटोकॉल उल्लंघनाची टीका केली आणि म्हणाले की, राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान दिला गेला नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी, "भाजपने राष्ट्रपतीपदाचे राजकारण करू नये", असा पलटवार केला आहे.


राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह


दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी सरकारचे वर्तन म्हणजे लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे आहे. राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टीका केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मुंसोबत झालेल्या व्यवहारावरून बॅनर्जींवर चौफेर टीका होत आहे.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती