ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचा (शरदचंद्र पवार) स्वतंत्र गट

अश्रफ (शानू) पठाण गटनेते


ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाने मोठी संघटनात्मक घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १२ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती दिली. या गटाच्या नेतृत्वाची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांना सादर केले.


नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत.


अश्रफ पठाण हे सलग तिसऱ्यांदा प्रभाग क्रमांक ३२ मधून निवडून आले असून, मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. त्यांच्या गटनेतेपदी निवडीमुळे ठाणे महापालिकेतील सत्तासमीकरणांत नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच