भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चावी फिरवणार

काँग्रेसच्या हातून महापौरपद थोडक्यात हुकणार?


भिवंडी : भिवंडी–निजामपूर शहर महापालिकेच्या महापौरपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच शहराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असून, सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने शुक्रवारी नगरसेवकांची बैठक घेऊन महापौरपदाबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काही खास ‘राजकीय खेळी’ खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


स्पष्ट बहुमत नसल्याने येत्या काही दिवसांत नगरसेवकांची फोडाफोडी आणि अर्थकारणाला ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ९० जागांच्या सभागृहात काँग्रेसने सर्वाधिक ३० जागा पटकावल्या आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला १२ जागा मिळाल्याने या दोन्ही पक्षांकडे मिळून ४२ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे भाजपने २२, तर शिवसेनेने १२ जागा जिंकत महायुतीचे एकूण संख्याबळ ३४ वर पोहोचले आहे. महापौर निवडीसाठी आवश्यक असलेल्या ४६ नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्ष व छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. समाजवादी पक्षाचे ६, कोणार्क विकास आघाडीचे ४, भिवंडी विकास आघाडीचे ३ आणि एका अपक्ष नगरसेवकामुळे सत्तासमीकरणे आणखी गुंतागुंतीची
झाली आहेत.


भिवंडीच्या राजकारणात ‘किंगमेकर’ म्हणून ओळख असलेले कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांची भूमिका यंदाही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटातील काही नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यांच्या एका निर्णयाने सत्तेचे पारडे कोणत्या बाजूला झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मागील कार्यकाळात काँग्रेसकडे बहुमत असतानाही विलास पाटील यांच्या रणनीतीमुळे प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. यंदा मात्र ‘काँग्रेसचाच महापौर बसेल,’ असा दावा स्थानिक नेते करत असतानाच भाजपनेही सत्ता स्थापनेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या