उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेची चावी ५० टक्के मराठी नगरसेवकांच्या हाती

उल्हासनगर : एकेकाळी सिंधी भाषिकांचे शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगरमध्ये यंदा महापालिका निवडणुकीत मराठी नगरसेवकांनी ५० टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. एकूण ७८ जागांपैकी ३९ जागांवर मराठी नगरसेवक निवडून आल्याने, आता मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही मराठी महापौराची मागणी जोर धरू लागली आहे. फाळणीच्या काळात विस्थापित झालेल्या सिंधी समाजाला कल्याणलगतच्या ब्रिटिशकालीन लष्करी छावणीत व खुल्या जागांवर वसवण्यात आले. उल्हास नदीमुळे शहराला ‘उल्हासनगर’ हे नाव मिळाले. आजही येथे सिंधी समाजाचा प्रभाव दिसून येतो. अनेक सिंधी कुटुंबे ठाणे, कल्याण, अंबरनाथ आदी शहरांकडे स्थलांतरित होत असताना मराठी व उत्तर भारतीय समाजाची संख्या वाढली आहे.


महापालिका निवडणुकीत ७८ पैकी ३९ म्हणजे ५० टक्के मराठी नगरसेवक निवडून आले आहेत. सिंधी समाजाचे २९ (३७ टक्के) नगरसेवक असून, शीख तसेच उत्तर भारतीय–बंगाली समाजाचे प्रत्येकी ५ नगरसेवक आहेत. शिवसेना (शिंदे गट) व ओमी टीमने एकूण ३६ जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी २२ मराठी, ८ सिंधी, ४ शीख आणि उर्वरित उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत.
भाजपच्या ३७ नगरसेवकांपैकी २० सिंधी समाजाचे, १३ मराठी, १ शीख आणि ३ उत्तर भारतीय–बंगाली समाजातील आहेत. तर अन्य ५ जागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे २, काँग्रेसचा १ आणि अपक्ष १ असे चार नगरसेवक मराठी समाजाचे असून, साई पक्षाचा १ नगरसेवक सिंधी समाजाचा आहे.

Comments
Add Comment

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी