ठाण्यात भाजपच्या प्रतिभा मढवी २८ नगरसेवकांमधून अव्वल

७१.५६ टक्के विक्रमी मतदानासह विजयी


ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ३९ पैकी २८ जागा जिंकत सुमारे ७५ टक्के स्ट्राईक रेट राखला आहे. या २८ विजयी नगरसेवकांमध्ये नौपाडा प्रभागातील प्रतिभा राजेश मढवी या उमेदवार ७१.५६ टक्के मतांसह भाजपमधील सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरल्या आहेत.


नौपाडा प्रभाग क्रमांक २१ ब मध्ये एकूण २५ हजार ७७ मतांपैकी प्रतिभा मढवी यांना तब्बल १७ हजार ९४५ मते मिळाली. डॉ. राजेश मढवी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या सामाजिक कार्याची ही मतदारांकडून मिळालेली पोहोचपावती असल्याचे मानले जात आहे.


ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत महायुतीत असलेल्या भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. २०१७ मध्ये भाजपच्या २३ जागा होत्या; यंदा त्यात ५ जागांची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार संजय केळकर, निवडणूक प्रभारी आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने ओवळा ते शिळपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघांत मजबूत कामगिरी केली. दरम्यान, भाजप–शिवसेना महायुतीतून ठाण्यात लढलेल्या एकूण १३१ जागांपैकी सात उमेदवारांना ७० टक्क्यांहून अधिक मतदान मिळाले आहे. यामध्ये शिवसेनेचे योगेश जानकर (७६.४६ टक्के) अव्वल ठरले असून, त्यापाठोपाठ डॉ. दर्शना जानकर (७२.३३ टक्के) आणि भाजपच्या प्रतिभा मढवी (७१.५६ टक्के) यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच