ठाण्याचा गड महायुतीने राखला

सलग दुसऱ्यांदा एकहाती वर्चस्व; सत्ता एकनाथ शिंदेंचीच


ठाणे :ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेला ‘शंभर पार’चा नारा यशस्वी ठरला असून, एकूण १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या यशातही स्पष्टपणे वर्चस्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच राहिले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने ७० हून अधिक जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे ठाण्याचे ‘ठाणेदार’ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी १ हजार १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी शिवसेना (शिंदे गट) चे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले.


महायुतीत शिवसेना (शिंदे गट) ने ८७ जागा, भाजपने ४० जागा तर मित्रपक्षांना ४ जागा देण्यात आल्या होत्या. निकालानुसार शिवसेनेचे ७० हून अधिक उमेदवार विजयी झाले असून, भाजपचे २७ ते २८ नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी बहुमताचा ६७ चा आकडा शिंदे गटाने सहज पार केल्याने पालिकेतील सत्ता पूर्णतः त्यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे महापौरपदही शिवसेना (शिंदे गट) कडेच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


निकराची लढत; शिंदेंचे पॅनल विजयी:


मानपाडा–आझादनगर येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेना (शिंदे गट) च्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह विक्रांत वायचळ, लहू पाटील आणि पदमा भगत हे चारही उमेदवार विजयी झाले. उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक भुषण भोईर आणि मधुकर पावशे यांनी जोरदार आव्हान दिले होते. मतदानानंतर दोन्ही समर्थकांमध्ये वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे आणि उबाठा गटाचे उमेदवारही रिंगणात असल्याने ही लढत अधिक चुरशीची ठरली. अखेर शिंदे गटाच्या पॅनलने येथे बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. ठाणे महापालिकेच्या या निकालामुळे सलग दुसऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे शहरावरचे राजकीय नियंत्रण अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


मनसे-काँग्रेस शून्य; दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष हरले:


काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का बसला असून, दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांचाही पराभव झाला. या दोन्ही पक्षांचे अक्षरशः धूळधाण झाली आहे. शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वर्चस्व कायम राखले आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी उबाठा, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याकडून महाविकास आघाडीची रणनिती आखण्यात आली होती. मनसेने महाविकास आघाडीतून २८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही मनसेला ठाण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Dombivali News : डोंबिवली - अखेर पी अँड टी कॉलनीतील पाणी प्रश्न मिटला

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेविका ऍड. कविता मिलिंद म्हात्रे यांनी

KDMC : केडीएमसीत धक्कादायक प्रकार; महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी, लिपिक...

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे एका लिपिकाकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम