शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर पराभूत

भाईंदर : मीरा भाईंदर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सतत तीन टर्म नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राजू भोईर प्रभाग क्र. १६ या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. राजकीय वारसा लाभलेले राजू भोईर यांचे आजोबा आणि वडील सरपंच होते. तर त्यांची आई नगरसेविका तसेच सभापती होत्या. त्यांचा वारसा चालवत राजू भोईर यांच्या सह त्यांची पत्नी भावना भोईर दोन टर्म नगरसेविका तर भाऊ कमलेश भोईर हे सुद्धा दोन टर्म नगरसेवक होते. या निवडणुकीत मात्र राजू भोईर, त्यांची पत्नी भावना भोईर आणि भाऊ कमलेश भोईर सर्व भोईर कुटुंब पराभूत झाले आहेत. राजू भोईर यांचा भाजपचे तरुण उमेदवार व पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेले नवीन सिंह यांनी पराभूत केले तर त्यांच्या पत्नीला भाजपच्या प्रतिभा जाट यांनी पराभूत केले, तर बंधू कमलेश भोईर यांना भाजपच्या मोहन म्हात्रे यांनी धूळ चारली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांना भाजपच्या संजय पवार यांनी पराभूत केले आहे.

Comments
Add Comment

Mulund Metro Slab: थेट रिक्षावर कोसळला मेट्रोचा स्लॅब; ३ ते ४ जण जखमी तर एकाच मृत्यू

मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या