BMC Election 2026 : मुंबईचा बॅास कोण ? बीएमसी निवडणूक निर्णायक टप्प्यात

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ कडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत असलं, तरी देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) सत्ता कोणाची येणार, याचीच सर्वाधिक चर्चा सुरु झाली आहे. तब्बल ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक बजेट असलेल्या बीएमसीसाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुंबईत सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात मतदारांचा उत्साह दिसून येत असतानाच, दक्षिण मुंबई आणि उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी नोंदवली गेली आहे.

भाजप-शिंदे युती पहिल्यांदाच मैदानात

भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पहिल्यांदाच बीएमसी निवडणूक युतीत लढवली आहे. युतीने मनपावर भगवा फडकवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे.

७५ हजार कोटींची बीएमसी – देशातील सर्वात श्रीमंत महापालिका

सुमारे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या बीएमसीचं वार्षिक बजेट ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. जे अनेक राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठं आहे. बीएमसीकडे तलाव, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, उद्याने आणि पायाभूत सुविधांची मोठी संपत्ती आहे. याशिवाय सुमारे ८० हजार कोटी रुपयांच्या एफडी बीएमसीकडे आहेत.

मुंबईत २२७ वॉर्ड, बहुमतासाठी ११४ ची आवश्यकता

मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ वॉर्ड आहेत. महापौर पद मिळवण्यासाठी किमान ११४ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक जागा महत्त्वाची ठरत आहे. काही वॉर्डमध्ये १२५ कोटी रुपयांपर्यंत संपत्ती असलेले उमेदवार देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

बीएमसीचा निधी कुठून येतो?

बीएमसीच्या उत्पन्नाचा मोठा भाग रिअल इस्टेट प्रकल्पांवरील प्रीमियममधून मिळतो. याशिवाय मालमत्ता कर, बाजारपेठांवरील कर, फ्लॅट्स, मॉल्स आणि जीएसटीमधून बीएमसीला दरवर्षी अब्जावधींचा महसूल मिळतो. त्यामुळे रस्ते, पूल, किनारी रस्ता, सांडपाणी प्रकल्प, गृहनिर्माण योजना यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधी सहज उपलब्ध होतो.
Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील