महापालिकांनंतर राज्यात जिल्हा परिषदांसाठी निवडणूक


मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या निवडणुकांसाठी मतदानाच्या २४ तास आधी प्रचार थांबेल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.



सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या बारा जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सोमवारी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली आहे. उर्वरीत जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.




जिल्हा परिषद निवडणूक १२ जिल्ह्यांमध्ये होणार


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी


या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागतील. निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग एक जुलै २०२५ ची मतदार यादी वापरणार आहे. निवडणूक आयोगाने एक जुलै २०२५ ची मतदार यादी अंतिम स्वरुपात ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे.


राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असतील. एकूण २.०९ कोटी मतदार मतदान करतील, त्यातील १.०२ कोटी महिला मतदार आहेत. एकूण बारा जिल्हा परिषदांसाठी ४३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत.


जिल्हा परिषदांसोबतच १२५ पंचायत समित्यांसाठी १४६२ सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. त्यातील ४३१ जागा महिलांसाठी, १६६ जागा अनुसुचित जातींसाठी आणि ३८ जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव असतील. मागास प्रवर्गासाठी ३४२ जागा राखीव असतील.






महाराष्ट्र : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६


उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १६ ते २१ जानेवारी


अर्ज छाननी : २२ जानेवारी


अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी, दुपारी ३ पर्यंत


अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर


मतदान : ५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०


मतमोजणी, निकाल : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० पासून


महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे.



Comments
Add Comment

Thrilling incident in Karnataka :प्रेयसीच्या अपहरणाचा प्रयत्न; कार स्फोटात प्रियकर ठार

तुमकुरु, कर्नाटक: प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक आणि भीषण घटना समोर आली आहे. ब्रेकअपनंतर प्रेयसीने मोबाईल नंबर

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Karachi Suicide Attack : कराचीत मोठा आत्मघाती हल्ला : चकमकीत चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू, पाच दहशतवादी ठार

- ‘जमात-उल-अहरार’ संघटनेने स्वीकारली जबाबदारी कराची : भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या कराची शहरात

Drug bust in Kerala : त्रिशूरमध्ये ३०८ ग्रॅम एमडीएमए जप्त, ७ तस्करांना अटक

त्रिशूर, केरळ : केरळ पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहीम राबवत त्रिशूर जिल्ह्यात हाय-प्रोफाईल ड्रग

Chandrapur News : चंद्रपुरात धक्कादायक घटना! नशेत असलेल्या आई-वडिलांकडून ४ महिन्यांचे बाळ रस्त्यावर पडले

चंद्रपूर : दारूच्या नशेत (Alcohol Intoxication) दुचाकी (Two-Wheeler) चालवणाऱ्या आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे चार महिन्यांचे बाळ

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड