महापालिकांनंतर राज्यात जिल्हा परिषदांसाठी निवडणूक


मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या निवडणुकांसाठी मतदानाच्या २४ तास आधी प्रचार थांबेल असे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले.



सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या बारा जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला सोमवारी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकीची घोषणा केली आहे. उर्वरीत जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.




जिल्हा परिषद निवडणूक १२ जिल्ह्यांमध्ये होणार


रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, परभणी


या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागतील. निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत त्या जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग एक जुलै २०२५ ची मतदार यादी वापरणार आहे. निवडणूक आयोगाने एक जुलै २०२५ ची मतदार यादी अंतिम स्वरुपात ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे.


राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी २५ हजार ४८२ मतदान केंद्र असतील. एकूण २.०९ कोटी मतदार मतदान करतील, त्यातील १.०२ कोटी महिला मतदार आहेत. एकूण बारा जिल्हा परिषदांसाठी ४३१ सदस्य निवडून द्यायचे आहेत.


जिल्हा परिषदांसोबतच १२५ पंचायत समित्यांसाठी १४६२ सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. त्यातील ४३१ जागा महिलांसाठी, १६६ जागा अनुसुचित जातींसाठी आणि ३८ जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव असतील. मागास प्रवर्गासाठी ३४२ जागा राखीव असतील.






महाराष्ट्र : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम २०२६


उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १६ ते २१ जानेवारी


अर्ज छाननी : २२ जानेवारी


अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी, दुपारी ३ पर्यंत


अंतिम उमेदवार यादी, चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर


मतदान : ५ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०


मतमोजणी, निकाल : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० पासून


महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे.



Comments
Add Comment

Nashik : पेठ तालुक्यातील ११ पर्यटक काठमांडूत अडकले, सुरक्षित परतीसाठी आवश्यक कार्यवाही सुरु

Nashik : नेपाळमध्ये भीषण महापुराने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नेपाळमध्ये भारतातील अनेक नागरिक अडकल्याची माहिती

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)