नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकत्र ...
माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ मध्ये १० फेब्रुवारी २०२६ रोजी सुधारणा करण्यात आल्या असून, त्या अंतर्गत हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. मुख्यत्वे ‘डीपफेक’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार करण्यात आलेल्या बनावट किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीला डिजिटल विश्वात आळा घालणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. नग्नता किंवा एखाद्याची बनावट ओळख सांगणाऱ्या आक्षेपार्ह सामग्रीबाबतच्या तक्रारींवर पूर्वीच्या २४ तासांऐवजी आता अवघ्या २ तासांच्या आत कारवाई करावी लागणार आहे. न्यायालय किंवा सक्षम सरकारी प्राधिकरणाकडून वैध आणि सकारण आदेश प्राप्त झाल्यानंतर बेकायदेशीर मजकूर हटवण्यासाठी आधी ३६ तासांची मुदत होती; आता ही कारवाई ३ तासांच्या आत करावी लागेल.
नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या गदारोळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) लोकसभा खासदारांची नाश्त्यावर बैठक ...
सामान्यांच्या तक्रारींनाही आता तात्काळ उत्तर द्यावे लागणार आहे. वापरकर्त्यांच्या सामान्य तक्रारींचे निवारण करण्याची मुदत ७२ तासांवरून कमी करून ३६ तास करण्यात आली आहे. भारतात ५० लाखांहून अधिक युजर्स असलेल्या प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांना बाल लैंगिक शोषण, बलात्कार किंवा पूर्वी हटवण्यात आलेल्या मजकुराशी साम्य असणाऱ्या सामग्रीचा आपोआप शोध घेण्यासाठी ऑटोमेटेड टूल्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या महिनाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू मुंबई : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या ...
केंद्र सरकारने अत्यंत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, नवीन आयटी नियमांचे पालन करण्यास अपयशी ठरणाऱ्या कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ‘कलम ७९’ अंतर्गत मिळणारे कायदेशीर संरक्षण (‘सेफ हार्बर’ सूट) गमवावे लागेल. हे संरक्षण रद्द झाल्यास प्लॅटफॉर्मवर युजर्सकडून पोस्ट होणाऱ्या कोणत्याही बेकायदेशीर मजकुरासाठी संबंधित सोशल मीडिया कंपनीला थेट जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर प्रचलित कायद्यांनुसार कडक फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. या कठोर पावलांमुळे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या गैरवापराला आळा बसेल आणि सायबर सुरक्षेत मोठी वाढ होईल, असा विश्वास सरकारतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.