Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शनिवारपासून राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील एकूण ७ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी केला आहे.



विविध विभागांमधील पावसाची स्थिती:


१. मराठवाडा: मराठवाड्यात मान्सूनचे ढग पुन्हा दाटून आले आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने विशेष 'यलो अलर्ट' जारी केला आहे. या भागात काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह आणि विजांच्या लखलखाटासह पाऊस पडू शकतो. तसेच या दरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


२. उत्तर महाराष्ट्र: उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यातील जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात. या दोन्ही जिल्ह्यांमधील घाटमाथ्यासह काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


३. कोकण आणि मुंबई परिसर: कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे अपेक्षित आहे. काही भागांत अचानक मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता असून संपूर्ण किनारपट्टीवर वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सध्या कोकणातील कोणत्याही जिल्ह्यासाठी हवामान विभातर्फे कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.


४. पश्चिम महाराष्ट्र: पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही पावसाची संततधार किंवा हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागातही सध्या कोणताही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.


हवामानातील या बदलामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण असले तरी, पिकांना या पावसाची गरज असलेल्या भागांत यामुळे दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी हवामानाच्या या स्थितीचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे आणि सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला

Ganpati Special Trains : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनची घोषणा

मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी निवडक गणपती स्पेशल

Megablock : मध्य,पश्चिम रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; अनेक लोकल सेवा रद्द, काहींच्या मार्गात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी, संकेत व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या

Pratik Karpe : भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांचे एआय व सॅटेलाईट मॅपिंग द्वारे सर्वेक्षण करा; नगरसेवक प्रतीक कर्पे यांची मागणी

मुंबई : भविष्यात उद्भवणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या (जागतिक तापमानवाढ) गंभीर धोक्याचा आणि वातावरणीय बदलांचा सामना

Jumbo Block : पश्चिम रेल्वेचा हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी जम्बो ब्लॉक आहे. प्रवाशांनी या जम्बो ब्लॉकची

Mumbai Bomb Threat : मुंबईत खळबळ! महापौर कार्यालय, BMC मुख्यालय आणि मेट्रो स्थानकांना बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. मुंबई महापौर कार्यालय,