मीरा-भाईंदरमध्ये विकासात आदर्श ठरला प्रभाग क्र. १८

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील महापालिकेचा प्रभाग क्र.१८ हा विकासात आदर्श ठरला असताना यावेळेस भाजपने उमेदवारी दिलेल्या चौघांचाही विचार केला असता या पुढील काळातसुद्धा आदर्श प्रभाग ठरेल यामुळे प्रभागातील नागरिकांनी शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


मीरा-भाईंदर महापालिकेचे ६ प्रभाग असून यात निवडणुकीच्या २३ प्रभागाची विभागणी करण्यात आली. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपाच्या नगरसेविका नीला सोन्स यांनी विकासाची अनेक कामे केली. स्वच्छता स्पर्धेत देशातून महापालिका पहिल्या क्रमांकावर विजयी झाली. त्या सर्व्हेक्षणात प्रभाग १८ चे योगदान अधिक झाल्याचे गुण पत्रिकेत आहे. त्यामुळे भाजपने दिलेल्या चार उमेदवारात मागील वेळेस यशस्वीरीत्या काम केलेल्या निला सोन्स यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तसेच महापालिकेच्या माजी महापौर निर्मला सावळे आणि २ युवा उमेदवारांना भाजपने संधी दिली. भाजपने १३ युवा सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली. त्यात प्रभाग क्रमांक १८ मधील २ उमेदवारांचा समावेश आहे. नीला सोन्स अनेक वर्षांपासून या प्रभागात काम करत असल्याने त्यांचा अनुभव दोन युवा उमेदवारांना होणार आहे. तसेच त्यांचा वाढता जनाधार पाहता भाजपचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य