काळाने घातला घाला ; पंढरपुरातील अहिल्या पुलावर ट्रॅक्टर आणि कंटेनरचा भीषण अपघात

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर रविवारी रात्री एक हृदयपिळवणारा भीषण अपघात झाला.यामध्ये ट्रॅक्टर आणि कंटेनरचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलावरून नदीपात्रात कोसळली. या दुर्दैवी दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांसह आठ जण गंभीर जखमी झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील असतोस कामगारांची एक टोळी कर्नाटकातून आपले काम संपवून ट्रॅक्टरने आपल्या मूळ गावी परतत होती. रात्री साडेआठच्या सुमारास हा ट्रॅक्टर चंद्रभागा नदीच्या अहिल्या पुलावर आला असता, समोरून येणाऱ्या कंटेनरशी त्याची धडक झाली. यावेळी दोन्ही वाहनांचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने थेट पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली.


ट्रॅक्टरमध्ये एकूण नऊ लोक प्रवास करत होते, तर कंटेनरमध्ये दोन लोक होते. हे सर्वजण वाहनांसह पुलाखाली कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या अंधारात हा अपघात झाल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमींना बाहेर काढले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.


या भीषण अपघातात महादेव दिलीप काळे (वय ५०) आणि राजू रमेश चव्हाण (वय ४०) या दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये ८ आणि ४ वर्षांच्या दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
लक्ष्मण राजेंद्र चव्हाण (३८), सुवर्णा ज्ञानेश्वर पवार (४५), अनिता भारत काळे (१९), विनोद सुखदेव गोमटे (३०), नाना हनुमंत काळे (३२), देवांगी राजेंद्र चव्हाण (८), गुड्डन राजेंद्र चव्हाण (४) आणि ब्रिजेश कुमार (३५) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत.


हे सर्व मजूर करकंब गावातील रहिवासी होते. पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकला गेलेली ही टोळी घरापासून काही अंतरावरच होती. अशात त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातामुळे करकंब गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे