कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही. ही निवडणूक पूर्णपणे निर्भय, पारदर्शक आणि लोकशाही मार्गानेच पार पडली पाहिजे, असे ठाम वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून, प्रमुख नेत्यांचे शहरागणिक दौरे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो प्रथम ठाण्यात तर त्यानंतर नवी मुंबईत पार पडला. या रोड शोदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले.


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “कुणाचीही गुंडागिरी, दादागिरी, पैसे वाटप खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांना मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.” तसेच पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, “ही निवडणूक अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होता कामा नये. निवडणुका येतील-जातील, पण कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.” “कुठल्याही दबावाखाली कोणतेही काम होता कामा नये. निवडणुका निर्भयपणे आणि लोकशाही मूल्यांनुसारच झाल्या पाहिजेत,” असे स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा