कुणाच्याही भूलथापांना, दबावाला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


नवी मुंबई : कुणाच्याही भुलथापा वा दबावाला बळी पडण्याचे कोणतेही कारण नाही. ही निवडणूक पूर्णपणे निर्भय, पारदर्शक आणि लोकशाही मार्गानेच पार पडली पाहिजे, असे ठाम वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून, प्रमुख नेत्यांचे शहरागणिक दौरे सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो प्रथम ठाण्यात तर त्यानंतर नवी मुंबईत पार पडला. या रोड शोदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले.


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “कुणाचीही गुंडागिरी, दादागिरी, पैसे वाटप खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांना मोडून काढल्याशिवाय राहणार नाही.” तसेच पोलिसांना उद्देशून ते म्हणाले, “ही निवडणूक अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होता कामा नये. निवडणुका येतील-जातील, पण कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.” “कुठल्याही दबावाखाली कोणतेही काम होता कामा नये. निवडणुका निर्भयपणे आणि लोकशाही मूल्यांनुसारच झाल्या पाहिजेत,” असे स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविकेची २४ तासांत भाजपमध्ये घरवापसी

मीरा-भाईंदर : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मीरा रोड येथील भाजपच्या माजी नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी

राज्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच महापौर!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ठाणे : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

खारघर-कामोठ्यात कमी दाबाने पाणीपुरवठा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत गळती आढळून

राबोडीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने

जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारावेळी अजित पवार गटाचे शक्तिप्रदर्शन ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरात बुधवारी

अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात