पोलिसांना चवकण्यासाठी चोरांनी लढवली अजब शक्कल...

नवी मुंबई : चोरी केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकवण्यासाठी गुन्हेगार कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण सानपाडा येथील सोन्याच्या चोरी प्रकरणातून समोर आले आहे. घरफोडीनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी तब्बल अडीच तास थेट रेल्वे रुळांवर थांबण्याची अफलातून युक्ती वापरली. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि गुप्त तपासामुळे अखेर या चोरीचा छडा लागला आहे.



चोरीनंतर अफलातून युक्ती


सानपाडा परिसरातील एका बंद घरात मागील महिन्यात घरफोडी झाली होती. या चोरीत चोरट्यांनी घरातील सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीनंतर आपला मागमूस लागू नये यासाठी आरोपींनी स्वतःकडे मोबाइल फोन न ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यात कैद होऊ नये म्हणून त्यांनी वेगळीच शक्कल लढवली. मध्यरात्री तीन वाजल्यापासून पहाटे साडेपाच वाजेपर्यंत ते थेट रेल्वे रुळांवर बसून राहिले.



सराईत गुन्हेगारांची ओळख पटली


या प्रकरणी आरिफ अन्सारी (वय ३४) आणि इस्तियाख अन्सारी (वय ५८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही टिटवाळा परिसरातील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी करण्यापूर्वी त्यांनी संबंधित घराची सखोल रेकी केली होती. चोरीनंतर पोलिसांचा तपास भरकटावा, यासाठीच त्यांनी ही अनोखी युक्ती अवलंबल्याचे तपासात निष्पन्न झाले.



पोलिसांच्या तपासाने केला पर्दाफाश


तपासात सुरुवातीला आरोपी स्टेशनपर्यंत आले असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र त्यानंतर त्यांच्या हालचालींचा कोणताही ठोस मागमूस मिळत नव्हता. गुन्हे शाखा कक्ष १ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि संशयास्पद हालचालींचा बारकाईने अभ्यास केला. पहाटे पहिली लोकल पकडण्यासाठी रुळांवरून बाहेर येणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. अखेर तपास टिटवाळा परिसरापर्यंत पोहोचला आणि नियोजनबद्ध सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने महत्त्वाची कामगिरी बजावली.

Comments
Add Comment

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.

Maharashtra Din 2026 : ठाण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

ठाणे : महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे

HSC Results 2026 : बारावीचा निकाल काही तासांवर; जाणून घ्या निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा २०२६ चा निकाल उद्या म्हणजेच शनिवार २ मे रोजी जाहीर होणार

Weather Update : पुढील ४८ तास अतिशय महत्त्वाचे! उष्णतेतून दिलासा, पण अवकाळीचं नवं संकट दारात; IMDचा हाय अलर्ट

मुंबई : राज्यात सध्या उष्णतेचा कडाका शिगेला पोहोचला असून विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै