अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती


अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्याच्या राजकारणात आज सर्वांत मोठी रणनिती उघडकीस आली आहे. राज्यात महायुती असली तरी ठाणे जिल्ह्यात भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) मोठा धक्का दिला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेससोबत युती केली. या खेळीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुळे विजयी झाल्या. निवडणुकीत भाजपला १६ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ नगरसेवक मिळून ३२ सदस्यांची मोट तयार झाली असून, भाजप बहुमत मिळवणार आहे.


अंबरनाथ नगर परिषद निवडणूक ही श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील बालेकिल्ला मानली जात होती. अनेक वर्षांपासून सत्ता राखणाऱ्या शिवसेनेला (शिंदे गट) भाजपच्या युतीने मोठा झटका दिला आहे. तेजश्री करंजुळे यांच्या यशामुळे शिवसेनेची (शिंदे गट) प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या युतीने अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषद राजकारणासाठी ही महत्त्वाची वळणबिंदू ठरणार आहे. भाजप उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे-पाटील यांनी असा दावा केला की, ''युतीसाठी शिवसेनेकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. निवडणुकीत अंबरनाथ नगर परिषदेची जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होती. ही नगर परिषद कल्याण लोकसभा मतदारसंघात येते, त्यामुळे भाजप-काँग्रेसची युती शिंदे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानली जात आहे.'' या युतीमुळे अंबरनाथमधील राजकीय समीकरण पूर्ण बदलले असून, भविष्यातील नगर परिषदेतील सत्ता विभाजनासाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे.

Comments
Add Comment

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी