अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक ९५ मधील शेखर वायंगणकर यांना अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे त्यांच्यासह २६ बंडखोरांची उबाठातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल परब यांनी मातोश्रीवर मध्यरात्री जोरदार राडा घातला होता. २८ डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या बैठकीत प्रभाग ९५ च्या उमेदवारीवरून वाद पेटला. अनिल परब यांनी आपला विश्वासू कार्यकर्ता शेखर वायंगणकर याला तिकीट देण्याची जोरदार मागणी केली होती.


मात्र, स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या शिफारशीवरून दिवंगत श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. या निर्णयाला अनिल परब यांनी कडाडून विरोध केला. बैठकीत सरदेसाई यांनी मध्ये तोंड घालताच दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद इतका विकोपाला गेला की, अनिल परब संतापून बैठक सोडून बाहेर पडले. शेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेतल्याने पक्षाने इतर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०