उबाठामध्ये अंतर्गत कलह, उमेदवारी देण्यावरुन वरुण विरुद्ध अनिल असा संघर्ष

मुंबई : वांद्रे पूर्व येथील प्रभाग क्रमांक ९५मधून उबाठाने हरी शास्त्री हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परंतु हरी शास्त्रीला उमेदवारी देण्यात आल्याने माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर हे नाराज होत अपक्ष उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली. हरी शास्त्री यांना युवा सुनेचे सरचिटणीस आणि आमदार वरुण सरदेसाई यांचा आशिर्वाद आहे, तर वायंगणकर यांना उबाठाचे नेते अनिल परब यांचा आशिर्वाद आहे. त्यामुळे या दोघांच्या चढाओढीत नक्की कुणाचा आशिर्वाद योग्य ठरतो आणि कुणाचा मारक ठरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ९५मधून भाजपचे सुहास आडिवरेकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्यासमोर उबाठाचे हरि शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आली. हरि शास्त्री यांना उमेदवारी देत आपला पत्ता कापल्याने माजी नगरसेवक आणि अनिल परब यांचे खंदे समर्थक असलेल्या चंद्रशेखर वायंगणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. मात्र, शेवटच्या दिवसापर्यंत वायंगणकर यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे वांयगणकर आणि हरि शास्त्री यांच्या जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. हरि शास्त्री हे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई असून युवा सेना सरचिटणीस आणि वांद्रे पूर्व विधानसभेचे उबाठा आमदार वरुण सरदेसाई यांचे समर्थक आहेत.तसेच विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे सरदेसाई यांनी माजी नगरसेवक वायंगणकर यांचा पत्ता कापून हरि शास्त्री यांना उमेदवारी जाहीर केली होती. या उमेदवारीवरून अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये तू तू मै मै झाल्याचेही वृत्त आहे. हरि शास्त्रीचा पराभव करत वरूण सरदेसाई यांचे महत्त्व कमी करण्याचा परब यांचा प्रयत्न असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. वरुण सरदेसाई यांचा हा हस्तक्षेप परब यांना सहन झालेला नाही. अशाचप्रकारे आपला पत्ता कापला जाईल याची भीती उबाठाचे दिनेश कुबल यांना आल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथील शाखाप्रमुखाला आपली ताकद दिली. त्यामुळे हरी शास्त्री यांना निवडणून आणण्यासाठी वरुण सरदेसाई आणि वायंगणकर यांना निवडून आणण्यासाठी अनिल परब यांच प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. वायंगणकर यांनी माध्यमांशी बोलतांना, मी जिंकल्यानंतर विजयाचा गुलाल घेवून मातोश्रीवर जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वायंगणकर यांच्या विजयासाठी परब हे अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत असून विभागातील नागरिकांमध्येही तशाप्रकारची चर्चा आहे.

Comments
Add Comment

मुंबई असुरक्षित असल्याच्या अफवा संजय राऊत पसरवतात, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय

'पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय होणार नाही'

मुंबई :  पेसा क्षेत्रातील १७ संवर्गांची नियुक्ती ही गुणवत्तेवर होत असून उमेदवारांच्या सेवाज्येष्ठतेवर अन्याय

खेड ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण; सरपंचांच्या खुर्चीला हादरा, विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू

- मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये

मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती

निधी संपवण्यासाठी महापालिका शाळांच्या मुलांची सहल; महापालिकेच्या स्थायी समितीने दाखवला प्रशासनाला इंगा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी