निधी संपवण्यासाठी महापालिका शाळांच्या मुलांची सहल; महापालिकेच्या स्थायी समितीने दाखवला प्रशासनाला इंगा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने अत्यंत घाईघाईत स्थायी समिती मंजुरीसाठी सादर केला. परंतु हा प्रस्ताव मुलांच्या सहलीपेक्षा यासाठी मंजूर निधी ३१ मार्च पूर्वी वापरण्यासाठी आणि पर्यायाने संस्थेची तिजोरी भरण्यासाठी असल्याचे स्पष्ट आरोपच करत हा प्रस्ताव राखून ठेवत प्रशासनाला आणखी एक इंगा दाखवला


स्थायी समितीच्या पटलावर शेवटच्या क्षणाला महापलिका शाळांमधील मुलांच्या सहलीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे सभागृहनेते गणेश खणकर यांनी याला हरकत घेत हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई न करता राखून ठेवण्याची सूचना केली. यावर शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी पाठिंबा देता इयत्ता ४थी आणि इयत्ता ७वीच्या विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या सहलीसाठी एकमेव संस्थेची निवड कशी केली असा सवाल उपस्थित केला. तसेच तब्बल ६६०० मुलांना घेवून जाणारी ही संस्था सुपरमॅन आहे का असा सवाल करत या मुलांची काळजी कोण घेणार अशी चिंता व्यक्त केली. सध्या परिक्षांचे दिवस आहेत, अशात या मुलांना कोणते पालक पाठवणार असाही सवाल केला. तर याला यामिनी जाधव यांनी पाठिंबा देत केवळ प्रत्येक मुलांमागे ७३० रुपये देण्यात येणार आहे मग त्यांना खायला काय देणार याचाही कुठेही उल्लेख नसल्याचे सांगितले. तर अश्रफ आझमी यांनी आचारसंहितेमुळे सहल आयोजित करता आली नसल्याचे सांगत शिक्षण विभागाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तर एमआयएमचे सलीम कुरेशी यांनी ६७०० हजार मुलांपैंकी १० ते २० टक्के मुले न आल्यास त्याचे पैसे संस्थेकडून परत घेतले जाणार का असा सवाल केला. तर डॉ सईदा खान यांनी सध्या दहावीच्या परिक्षा सुरु असून शिक्षक या मुलांच्या परीक्षा सांभाळून या सहलीचे आयोजन कसे करणार असा सवाल केला. त्यामुळे अशाप्रकारची मुलांची सहल असेल तर आधी जावून पाहून मगच त्यानुसार मुलांच्या सहलीचे आयोजन करावे अशी सूचना केली. तर मनसेच यशवंत किल्लेदार यांनी ही सहल ०९ ते २७ मार्च दरम्यान काढली जाणार असून त्यातील शनिवार आणि रविवार वगळता उर्वरीत दहा दिवस आहेत. यात प्रत्येक दिवशी २ हजार विद्यार्थी गृहीत धरले तर २० हजार मुले होता, मग उर्वरीत मुलांचे काय करणार असा सवाल त्यांनी केला. यावर अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सर्व सदस्यांनी उपस्थित केलेला मुद्दयांची दखल घेवून माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे या प्रस्तावामध्ये सहलीसाठी नियुक्त श्रीयांश एंटरप्रायझेस या संस्थेला ३१ मार्च २०२६ पूर्वी संबंधित लेखा विभागार्फत अधिदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे नमुद केले.त्यामुळे तरतूद निधी संपवण्यासाठी आणि ठराविक एकमेव संस्थेला काम देण्याचा प्रशासनाचा डाव उघडकीस आल्यामुळे सभागृहनेेते आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांनी याला आक्षेप घेत प्रशासनाचे मनसुबे उधळून लावले.



कुठल्या ठिकाणी किती मुले जाणार सहलीला


 

भायखळा राणीबाग : इयत्ता ४थी, एकूण मुले ३६,७२०


सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ३१ लाख ३३ हजार ६००


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली : इयत्ता ७वी, २९,०६४ व माध्यमिक ८४६


सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ०९ लाख ३७ हजार रुपये

Comments
Add Comment

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे

Central Railway New Rules : रेल्वेच्या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास, आरक्षित डब्यात घुसखोरी केल्यास आता भरावा लागणार हजारोंचा दंड; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

मुंबई : रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने रेल्वे कायदा, १९८९

Nitesh Rane : पाणी साठवण प्रकल्पाला खोपोली मत्स्यबीज केंद्राची जागा देणार, मत्स्य उत्पादनावर परिणाम होणार नाही; मंत्री नितेश राणे

सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून तोडगा

Nitesh Rane : मत्स्य महाविद्यालयाचा तात्काळ प्रस्ताव सादर करा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

रामेश्वर-देवगड येथे आंबा संशोधन उपकेंद्रांतर्गत कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्तावही

Uorfi Javed : १ रुपया तरी घेतलाय हे सिद्ध करा, अकाऊंट डीॲक्टिव्हेट करेन! सीजेपीला पाठिंबा दिल्याच्या आरोपांवर उर्फी जावेद भडकली

मुंबई : आपल्या अतरंगी फॅशन आणि रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद