मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय


मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात १०४ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी दाखल होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.


नियम ९२ अन्वये आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून येथील वाढत्या नागरीकरणाच्या गरजा ओळखून अग्निशमन यंत्रणा अधिक प्रगत करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९४ मीटर उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र, चेन्नईमध्ये सध्या देशातील सर्वाधिक उंच १०४ मीटरची शिडी वापरात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईसाठी त्यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.


उंच इमारतींच्या सुरक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, "उंच इमारतींमध्ये आता आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केप यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. या सर्व उपाययोजनांची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे इमारतींना अंतिम परवानगी दिली जाते." आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यास सरकारचे प्राधान्य असून, भविष्यात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ही यंत्रणा अधिक बळकट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती