मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय


मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात १०४ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी दाखल होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.


नियम ९२ अन्वये आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून येथील वाढत्या नागरीकरणाच्या गरजा ओळखून अग्निशमन यंत्रणा अधिक प्रगत करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९४ मीटर उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र, चेन्नईमध्ये सध्या देशातील सर्वाधिक उंच १०४ मीटरची शिडी वापरात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईसाठी त्यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.


उंच इमारतींच्या सुरक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, "उंच इमारतींमध्ये आता आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केप यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. या सर्व उपाययोजनांची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे इमारतींना अंतिम परवानगी दिली जाते." आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यास सरकारचे प्राधान्य असून, भविष्यात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ही यंत्रणा अधिक बळकट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली

Chandrashekar Bawankule : मानखुर्दमधील २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी घेतली भेट मुंबई : मानखुर्द (पूर्व) मंडाला

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे