मुंबईतील आग विझवण्यासाठी १०४ मीटरची शिडी आणणार

मंत्री उदय सामंत; टोलेजंग इमारतींची संख्या वाढत असल्याने निर्णय


मुंबई : मुंबईतील टोलेजंग इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, शहराची अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात १०४ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी दाखल होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.


नियम ९२ अन्वये आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सामंत बोलत होते. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून येथील वाढत्या नागरीकरणाच्या गरजा ओळखून अग्निशमन यंत्रणा अधिक प्रगत करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या ९४ मीटर उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र, चेन्नईमध्ये सध्या देशातील सर्वाधिक उंच १०४ मीटरची शिडी वापरात आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईसाठी त्यापेक्षाही अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.


उंच इमारतींच्या सुरक्षेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, "उंच इमारतींमध्ये आता आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केप यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. या सर्व उपाययोजनांची पूर्तता झाल्याची खात्री पटल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन दलातर्फे इमारतींना अंतिम परवानगी दिली जाते." आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यास सरकारचे प्राधान्य असून, भविष्यात अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ही यंत्रणा अधिक बळकट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र