मुंबई असुरक्षित असल्याच्या अफवा संजय राऊत पसरवतात, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊतांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. विधानभवनाबद्दल धमकी आणि ज्या कोणी अफवा पसरवण्याचे काम केले त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मात्र ‘मुंबई सुरक्षित नाही’ अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने राऊत यांच्यामार्फत केले जात आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. जेव्हापासून केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तेव्हापासून मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकले नाही. तत्कालिन मविआ सरकारचे गृहमंत्री शंभर कोटींची वसुली कशी करत होते हे राऊतांनी आठवावे आणि मग इतरांवर टीका करावी असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.


स्वतः सालगडी असणा-या राऊतांनी साला या शब्दावर आक्षेप घेणे म्हणजे विनोद आहे असा टोमणा बन यांनी लगावला. काँग्रेसला देशाची आणि भारतीयांची काळजी नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कॉमेडी सर्कस सुरू असून या सर्कसमध्ये मनोरंजनासाठी विदूषक म्हणून संजय राऊतांना चाकरीला ठेवले आहे असे शरसंधान त्यांनी साधले.


इराण इस्राएल युद्धाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करतात या भानगडीत राऊतांनी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून आखाती देशांतील युद्धाच्या स्थितीतही सुरक्षित आहे. पंतप्रधान काय करतात हे आत्ता युद्धजन्य स्थितीत दिसून आले पण हे समजण्याएवढी राऊतांची बौद्धीक कुवत नाही. जगातील भल्या भल्या देशांना युद्धाची झळ बसली असताना भारत देश आणि भारतीय निश्चिंत आणि सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सातत्याने बैठका घेतात, युद्धस्थितीत भारताला कमीतकमी झळ बसावी यासाठी उपाययोजना करत आहेत. घरात बसून फेसबुक लाईव्ह करणा-यांना याचे मोल कळणार नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.


अफजलखान, औरंगजेबाचा उदो उदो करण्यात धन्यता मानणा-या राऊतांना, उबाठा गटाला ‘जय श्री राम’ घोषणेचे महत्व कळणार नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. ‘जय श्री राम’ चे नामस्मरण करण्यास तुम्हाला लाज वाटत असेल आम्हाला मन:शांती आणि आनंद मिळतो. ‘जय श्री राम’ चा संबंध गॅस सिलेंडर पुरवठा करण्याशी जोडून राऊतांनी वैचारिक आणि बौद्धीक पातळी किती खालावली आहे हे दाखवून दिले आहे. देशाचे संरक्षण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत त्याची चिंता राऊतांनी करूच नये असेही बन यांनी खडसावले.

Comments
Add Comment

INDvsAFG : भारताने अफगाणिस्तान विरुद्धची पहिली ODI सात विकेट्सनी जिंकली, शुभमनचे शानदार अर्धशतक; रोहितचा विक्रम

धर्मशाळा : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे झालेल्या अफगाणिस्तान विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय

EL Nino : 'अल निनो'मुळे दुष्काळाचा धोका ? पाणी जपून वापरण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची

Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात

PV Sindhu : सिंधूचे ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतले आव्हान संपले

सिडनी : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील विजेतेपदाची आशा उपांत्य

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त

Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी