मुंबई असुरक्षित असल्याच्या अफवा संजय राऊत पसरवतात, नवनाथ बन यांचा हल्लाबोल

मुंबई : मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित आहे. संजय राऊतांना त्याची काळजी करण्याची गरज नाही. विधानभवनाबद्दल धमकी आणि ज्या कोणी अफवा पसरवण्याचे काम केले त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. मात्र ‘मुंबई सुरक्षित नाही’ अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचे काम नियोजनबद्ध रीतीने राऊत यांच्यामार्फत केले जात आहे असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. जेव्हापासून केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तेव्हापासून मुंबईकडे कोणी वाकड्या नजरेने बघू शकले नाही. तत्कालिन मविआ सरकारचे गृहमंत्री शंभर कोटींची वसुली कशी करत होते हे राऊतांनी आठवावे आणि मग इतरांवर टीका करावी असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.


स्वतः सालगडी असणा-या राऊतांनी साला या शब्दावर आक्षेप घेणे म्हणजे विनोद आहे असा टोमणा बन यांनी लगावला. काँग्रेसला देशाची आणि भारतीयांची काळजी नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची कॉमेडी सर्कस सुरू असून या सर्कसमध्ये मनोरंजनासाठी विदूषक म्हणून संजय राऊतांना चाकरीला ठेवले आहे असे शरसंधान त्यांनी साधले.


इराण इस्राएल युद्धाच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय करतात या भानगडीत राऊतांनी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर असून आखाती देशांतील युद्धाच्या स्थितीतही सुरक्षित आहे. पंतप्रधान काय करतात हे आत्ता युद्धजन्य स्थितीत दिसून आले पण हे समजण्याएवढी राऊतांची बौद्धीक कुवत नाही. जगातील भल्या भल्या देशांना युद्धाची झळ बसली असताना भारत देश आणि भारतीय निश्चिंत आणि सुरक्षित रहावेत यासाठी पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ सातत्याने बैठका घेतात, युद्धस्थितीत भारताला कमीतकमी झळ बसावी यासाठी उपाययोजना करत आहेत. घरात बसून फेसबुक लाईव्ह करणा-यांना याचे मोल कळणार नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला.


अफजलखान, औरंगजेबाचा उदो उदो करण्यात धन्यता मानणा-या राऊतांना, उबाठा गटाला ‘जय श्री राम’ घोषणेचे महत्व कळणार नाही अशी बोचरी टीका बन यांनी केली. ‘जय श्री राम’ चे नामस्मरण करण्यास तुम्हाला लाज वाटत असेल आम्हाला मन:शांती आणि आनंद मिळतो. ‘जय श्री राम’ चा संबंध गॅस सिलेंडर पुरवठा करण्याशी जोडून राऊतांनी वैचारिक आणि बौद्धीक पातळी किती खालावली आहे हे दाखवून दिले आहे. देशाचे संरक्षण करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत त्याची चिंता राऊतांनी करूच नये असेही बन यांनी खडसावले.

Comments
Add Comment

Mumbai-Pune Expressway Missing Link : महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुली

- पहिल्या टप्प्यात अवजड वाहनांना प्रवेशबंदी; प्रवास होणार अधिक जलद व सुरक्षित मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास

Patra Chawl Residents : पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून १० टक्के भाडेवाढ देण्याचा निर्णय

मुंबई : गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरवार ३०

Nepal Airlines : जम्मू-काश्मीर पाकिस्तानचा भाग दाखवल्याने नेपाळ एअरलाइन्सने मागितली माफी

नेपाळ एअरलाइन्सला सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नकाशामुळे मोठ्या वादाला सामोरे जावे लागले असून, या प्रकरणाने

Jaish-e-Mohammed Top Commander : पाकिस्तानात मोठी खळबळ! जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा ‘संशयास्पद’ अपघाती मृत्यू

- अपघात की टार्गेट किलिंग? पाकिस्तानच्या बहावलपूर शहरातून पुन्हा एकदा एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना समोर आली

Breaking News : विधान परिषदेआधी मोठी घडामोड; बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याच्या मार्गावर आहे. बच्चू कडू यांच्या

BMC News : झाडांच्या फांद्या छाटणीत पक्ष्यांचे घेतले जातात जीव

- अनेक फांद्यावरील पक्ष्यांची घरटी, पिल्लांना धोका, मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत सध्या मान्सून पूर्व