खेड ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण; सरपंचांच्या खुर्चीला हादरा, विभागीय आयुक्तांकडे सुनावणी सुरू

- मंत्री जयकुमार गोरे यांची विधानपरिषदेत माहिती


मुंबई : सातारा जिल्ह्यातील खेड ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली झालेल्या मोठ्या आर्थिक अनियमिततेचे पडसाद आता थेट परिषदेत उमटले आहेत. या प्रकरणी दोषी आढळलेल्या सरपंचांविरोधात कडक कारवाईची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली असून, लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली.



नेमके प्रकरण काय?


खेड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना मंत्री गोरे यांनी संपूर्ण चौकशीचा पाढा वाचला. २८ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. उपअभियंत्यांच्या समितीने ५ मे २०२३ रोजी सादर केलेल्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर आले. ग्रामपंचायतीने तब्बल १२ विकासकामे करताना कोणतेही अंदाजपत्रक तयार केले नव्हते, तांत्रिक मान्यता घेतली नव्हती आणि निविदा प्रक्रियेलाही हरताळ फासल्याचे निष्पन्न झाले. या गैरव्यवहाराची व्याप्ती लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केले आहे. केवळ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून न थांबता, याला जबाबदार असणाऱ्या सरपंचांवरही महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सरपंचांना पदावरून हटवण्याबाबतचा प्रस्ताव आता विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून, या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली आहे.


या प्रकरणात फेरचौकशीचे आदेश देण्यात आले होते, ज्यामध्ये अनियमिततेवर शिक्कामोर्तब झाले आहे. "विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाचा निकाल एका निश्चित मुदतीत लावावा, अशा स्पष्ट सूचना शासन स्तरावरून देण्यात येतील," असे आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. यामुळे खेड ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र

Ashok Kharat Case : गुन्ह्यांची कबुली देता देता खरातच्या तोंडाला आला फेस ; करतोय गजनी होण्याची नाटकं

नाशिक : अशोक खरातने निर्माण केलेल्या मायाजालाच कोड काही सुटता सुटत नाही आहे. आतापर्यंत त्याच्या विरुद्ध

Unauthorized Schools : मुंबईतील १६४ अनधिकृत शाळा नोटीस देवूनही सुरुच , संस्थाचालकांवर कारवाई करा

शिक्षण समितीच्या बैठकीत उमटले तीव्र पडसाद मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठरलेल्या १६४ शाळांपैंकी ६५ शाळा या केवळ

KEM Hospital : केईएम रुग्णालयात रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न... सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षांनी घटनास्थळी केली पाहणी

मुंबई : महानगरपालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल येथे शुक्रवारी सकाळी घटनेत घटनेत 27 वर्षीय एका रुग्णाने आत्महत्येचा

NCP : राष्ट्रवादीपुढे अंतर्गत बंडाळीचे आव्हान; सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार यांच्यात जबाबदाऱ्यांचे वाटप

मुंबई : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी संघटनात्मक फेररचना करण्यात आली असून

Marathi : रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीवरून मुंबईत ठिणगी

मुंबई : शहरातील रिक्षावाल्यांना मराठीची सक्ती करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी