स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. सांडपाणी मिसळलेले पाणी प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भागीरथपुरा परिसरात पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळल्यामुळे चार नागरिकांचा मृत्यू झाला असून १४९ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.


जलवाहिनीत गळती झाली. गळतीमुळे शौचालयाचे सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकत्र झाल्यामुळे मोठे संकट निर्माण झाले. या प्रकरणी इंदूरचे आयुक्त आणि महापौर यांनी चौकशीचे आदेश दिले


नव्या जलवाहिनीला मंजुरी दिली असूनही कामाने अपेक्षेप्रमाणे गती घेतलेली नाही. आता सांडपाणी आणि पिण्याचे पाणी एकमेकांत मिसळण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने याला प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा ठरवत महापौर आणि आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

नववर्षात 'या' पाच राज्यात होणार निवडणूकांची रणधुमाळी! सर्व पक्षांनी केली तयारीला सुरुवात

नवी दिल्ली: राजकीय घटनांबाबत गतवर्षात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव देशाने घेतला. राज्यांनुसार

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या