तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच 'प्रतिष्ठा द्वादशी'या शुभमुहुर्तावर दोन वर्षांपूर्वी राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारी २०२४ रोजी राममंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या ऐतिहासिक शुभ प्रसंगाला तिथीनुसार आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आज अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


राम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्यापूर्वी २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अयोध्येत भव्य ध्वजारोहण सोहळा पार प़डला होता. ध्वजारोहण सोहळा हा राम मंदिराच्या पूर्णतेचे प्रतीक आहे. त्यामुळे आज मंदिराच्या पूर्णतेनंतर पहिलाच वर्धापन दिन सोहळा असे म्हणण्यास हरकत नाही. आजचा सोहळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित पार पडणार आहे.


राम मंदिराला दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे अयोध्येत पाच दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. ज्याची सुरुवात २८ तारखेपासून झाली आहे. मात्र या पाच दिवसांमध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या पाच दिवसीय भव्य सोहळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी मंदिर ट्रस्टने व्यापक व्यवस्था केली आहे.


या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात वाहतूक आणि सुरक्षा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. अयोध्येत वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे, बाहेरील भागात ३६ नियुक्त पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. गर्दीचे नियमन करण्यासाठी आणि टप्प्याटप्प्याने दर्शन घेण्याची परवानगी देण्यासाठी होल्डिंग एरिया देखील तयार करण्यात आले आहेत. तसेच दक्षता म्हणून प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकारी तैनात आहेत. ड्रोनविरोधी यंत्रणादेखील सक्रिय करण्यात आल्या आहेत.
Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड