नवली उड्डाणपुलावर पतंगाच्या मांज्यामुळे अपघात

पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान कापला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. संक्रात हा सण जवळ आला असून पालघर शहर व परिसरात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले असून नायलॉन व चायनीज मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच वाहनचालकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत अशा मांज्यांमुळे किरकोळ व गंभीर जखमा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पूल, मुख्य रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी पतंगाची मांज्या अचानक गळ्यात, हाताला किंवा चेहऱ्यावर अडकून अपघात घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याकडे पालघर नगर परिषद, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन चायनीज मांज्यावर कडक बंदीची अंमलबजावणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Amit Shah : गांधीनगरमध्ये घुमला शिवरायांचा जयघोष! गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये 'महाराष्ट्र समाज' तर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी

Mumbai: महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार; हायकोर्टाचा निर्णय

मुंबई: अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन

Nations First Humanity Ai City : भारताची एआय झेप! बंगळुरूमध्ये साकारणार देशातील पहिली 'Humanity AI City', केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले ?

नवी दिल्ली : भारताला जागतिक 'एआय हब' बनवण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील एआय इन्फ्रास्ट्रक्चर अधिक

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी

विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक

Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू