नवली उड्डाणपुलावर पतंगाच्या मांज्यामुळे अपघात

पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान कापला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. संक्रात हा सण जवळ आला असून पालघर शहर व परिसरात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले असून नायलॉन व चायनीज मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच वाहनचालकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत अशा मांज्यांमुळे किरकोळ व गंभीर जखमा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पूल, मुख्य रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी पतंगाची मांज्या अचानक गळ्यात, हाताला किंवा चेहऱ्यावर अडकून अपघात घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याकडे पालघर नगर परिषद, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन चायनीज मांज्यावर कडक बंदीची अंमलबजावणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय