नवली उड्डाणपुलावर पतंगाच्या मांज्यामुळे अपघात

पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान कापला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. संक्रात हा सण जवळ आला असून पालघर शहर व परिसरात पतंग उडवण्याचे प्रमाण वाढले असून नायलॉन व चायनीज मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच वाहनचालकांना गंभीर अपघातांना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांत अशा मांज्यांमुळे किरकोळ व गंभीर जखमा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः पूल, मुख्य रस्ते व वर्दळीच्या ठिकाणी पतंगाची मांज्या अचानक गळ्यात, हाताला किंवा चेहऱ्यावर अडकून अपघात घडत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याकडे पालघर नगर परिषद, पोलीस प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन चायनीज मांज्यावर कडक बंदीची अंमलबजावणी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Shambhavi Pathak Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानाची को-पायलट शांभवी पाठक कोण होती ? आर्मी ऑफिसरची लेक अन् १५०० तासांचा अनुभव...

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, या अपघातातील

'अजित पवारांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला'

आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला... मुंबई - आमचे

तेलाच्या शेअर्समध्ये आज मजबूत १०% वाढ 'या' कारणांमुळे वाढत आहे ओएनजीसी,ऑईल इंडियाचे शेअर

मोहित सोमण: आज जागतिक तेल बाजारात अडथळे (Disruption) आल्यानंतर तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली ज्याचा परिणाम म्हणून

Ajit Pawar Passed Away : राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार मुंबई : विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले

अजित पवारांच्या विमान अपघाताची ‘डीजीसीए’कडून चौकशी सुरू

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर या भीषण दुर्घटनेच्या कारणांचा शोध