'आरपीआय'ला १५ जागांवर महायुती पाठिंबा देणार


रामदास आठवले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महायुतीकडून सकारात्मक प्रतिसाद


मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर महायुतीने तातडीने दखल घेतली आहे. आरपीआयच्या नाराजीचे वृत्त समोर येताच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आठवले यांची वांद्रे येथील कार्यालयात भेट घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, आरपीआयने स्वबळावर उतरवलेल्या ३८ उमेदवारांपैकी मेरिट असलेल्या १५ जागांवर महायुतीकडून पाठिंबा देण्यात येणार आहे. तसेच, निवडक जागा आरपीआयला सोडण्याबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आठवले यांची संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी बैठकीनंतर दिली.


वांद्रे येथील कार्यालयात प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. अर्धा तास चालेल्या चर्चेत आरपीआयची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाच्या जागा आरपीआयला सोडण्याबाबत महायुतीत सकारात्मक विचारविनिमय सुरू असल्याचे दरेकर यांनी सांगितले.


Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.